महात्मा गांधी भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi

Mahatma Gandhi Speech in Marathi – Speech On Mahatma Gandhi in Marathi महात्मा गांधी जयंती भाषण मराठी आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महोदय, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सूत्रसंचालक, उपस्थित मान्यवर तसेच, आयोजक वर्ग या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. कारण, त्यांच्यामुळे मला आज याठिकाणी महात्मा गांधीजीं विषयी बोलण्याची संधी मिळतेय. खरंतर मित्रांनो, आपल्या भारतमातेचे थोर सुपूत्र, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच, संपूर्ण विश्वाला अहिंसेचा महान संदेश देणारे, आपल्या भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे वंदनीय युगपुरूष होते.

देशाच्या स्वातंत्र्यकालीन इतिहासातील महानक्रांतिकारक, शांतता व अहिंसेचे पुजारक ‘महात्मा गांधी’ यांचा जन्म सन २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरात राज्यामधील पोरबंदर या शहरात झाला होता. महात्मा गांधींचे पूर्ण नाव ‘मोहनदास करमचंद गांधी’ असे होते. परंतु, आपल्या भारतातील लोक प्रेमाने त्यांना बापू असे म्हणत असतं. रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या बापूंना  सर्वप्रथम “महात्मा” ही उपाधी धारण केली होती.

“बापू सन्मान करतो आम्ही, तुमच्या महान नेतृत्वाचा. भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला, हा दाखला आहे तुमच्या कर्तुत्वाचा!”

महात्मा गांधी भाषण मराठी – Mahatma Gandhi Speech in Marathi

Mahatma gandhi bhashan.

तसेच, सन १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना “राष्ट्रपिता” म्हणून पहिल्यांदा संबोधले होते. महात्मा गांधी यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई असे होते. महात्मा गांधी यांचे वडिल करमचंद गांधी हे तत्कालीन काठेवाड प्रांतामधील पोरबंदर या ठिकाणी दिवाण म्हणून काम करीत असतं.

करमचंद गांधी यांची चार लग्न झाली होती, त्यातील पुतळाबाई या करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी होत्या. त्याकाळी, आताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उपलब्ध असलेले दवाखाने नव्हते, त्यामुळे करमचंद गांधी यांच्या आधीच्या तीन पत्नींचे प्रसूतीदरम्यानच निधन झाले होते. त्यामुळे, त्यांनी चौथे लग्न महात्मा गांधीजींच्या मातोश्री म्हणजेच पुतळाबाई यांच्यासोबत केले होते.

करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी पुतळाबाई या महात्मा गांधी यांच्या आई होत. पुतळाबाई या खूपच धार्मिक वृत्तीच्या होत्या, त्या सतत उपवास करीत असतं.

पुतळाबाईंनी महात्मा गांधीजींच्या मनावर बालवयात केलेल्या धार्मिक संस्कारांचा प्रभाव आपणा सर्वांना त्यांच्या पुढील जीवनात झालेला दिसून येतो. मोहनदास करमचंद गांधी यांच्या मनावर त्यांच्या मातोश्रींनी त्यांच्या बालपणीच अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता यांसारख्या तत्वांचे बीज रुजवले होते.

शिवाय, प्राणिमात्रांवर दया करणे, त्यांच्यावर करुणा दाखवणे, गरजूंना मदत करणे आणि स्त्रियांचा आदर करणे, यासारखे अनेक संस्कार गांधीजींच्या मनावर त्यांच्या आईकडूनच गिरवण्यात आले होते. महात्मा गांधीजींच्या लहानपणी त्यांच्या आई पुतळाबाई त्यांना जैन संकल्प आणि त्यांच्या प्रथांबद्दल माहिती सांगत असतं.

  • नक्की वाचा: स्वातंत्र्य दिनाचे भाषण

यामुळे, लहानपणापासूनच महात्मा गांधीजींना उपवास करण्याची सवय लागली होती. जैन धर्मातील संकल्पांचा आणि प्रथांचा त्यांच्या मनावर खूप मोठा प्रभाव पडला होता.

मित्रांनो, महात्मा गांधीजी एक गोष्ट स्वत: कबूल करतात की, पौराणिक कथेतील श्रावणबाळ आणि राजा हरीश्चंद्र या दोन कथांतील व्यक्तीमत्वांचा त्यांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडला होता. स्वातंत्र्य पूर्व काळात आपल्या भारत देशामध्ये  बालविवाह करण्याची प्रथा अस्तित्वात होती.

त्या प्रथेनुसार महात्मा गांधी यांचा विवाह इ.स. १८३३ साली वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी असताना, ‘कस्तूरबा माखनजी कपाडिया’ यांच्यासोबत झाला होता. गांधीजी त्यांना प्रेमाने “बा” असे म्हणत. लग्नानंतर महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी या प्रथेप्रमाणे बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच राहिल्या.

यामुळे, महात्मा गांधी यांच्या शालेय शिक्षणात एक वर्षाचा खंड पडला होता. इ.स. १८८५ साली महात्मा गांधीजी फक्त पंधरा वर्षांचे असताना, त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याचवर्षी महात्मा गांधीजींना एक अपत्य देखील झाले होते. परंतु, ते जास्त काळ जगू शकले नाही.

यानंतर महात्मा गांधी यांना चार मुले झाली. ती पुढीलप्रमाणे; इ.स. १८८८ साली हरीलाल, इ.स. १८९२ साली मणिलाल, इ.स. १८९७ साली रामदास आणि इ.स. १९०० साली देवदास. महात्मा गांधी यांची लहानपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती. परंतु, त्यांच्या वडिलांची त्यांना सरकारी नोकरीत दाखल करण्याची इच्छा होती.

त्यामुळे, इसवी सन १९८८ साली आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महात्मा गांधीजी उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला गेले. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी ‘इनर टेंपल’ या गावी राहून, भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा भरपूर अभ्यास केला. अशा प्रकारे, महात्मा गांधीजींनी लंडनच्या  विद्यापीठामधून आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.

वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, महात्मा गांधीजी इंग्लंडमध्ये गेले होते, तिथे त्यांना इंग्लंड देशाचे सर्व रीतीरिवाज समजून घेण्यात काही वेळ लागला.

खरंतर मित्रांनो, इंग्लंडमध्ये सर्व पदार्थ मांसाहारी मिळत असल्याने, महात्मा गांधीजींना शाकाहारी पदार्थ जेवायला मिळेपर्यंत उपाशी राहावं लागतं असे. महात्मा गांधीजी हे आपल्या आईला दिलेल्या वचनाशी कटीबद्ध असल्याने, त्यांनी त्या ठिकाणी मांसाहार, मद्यपान करणे वर्ज्य केले. त्याठिकाणी त्यांनी शाकाहारी माणसे शोधली आणि त्यांची एक संघटना स्थापन केली.

अशा पद्धतीने, महात्मा गांधीजी स्वतः त्या संघटनेचे अध्यक्ष बनले. महात्मा गांधीजी लंडनमध्ये ज्या शाकाहारी लोकांना भेटले होते, त्यातील काही लोक हे ‘थीयोसोफिकल सोसायटी’ चे सदस्य देखील होते.

महात्मा गांधीजींनी  त्याठिकाणी राहून तेथील चालीरीती शिकण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, बापू बॅरिस्टर बनून सन १८९१ साली आपल्या भारत देशात परत आले आणि भारतात  आल्यानंतर ते वकिली करू लागले.

  • नक्की वाचा: शिक्षक दिनाचे भाषण

ज्यावेळी त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली होती, त्यावेळी त्यांना न्यायादिशासमोर एखादा मुद्दा मांडणे म्हणजे खूप कठीण वाटत होते. मित्रहो, सुरुवातीला त्यांना वकिलाचे हे काम अजिबात जमत नव्हते. बापू आपल्या लाजाळू वृत्तीच्या स्वभावामुळे कोर्टात कुणाशीही फार बोलत देखील नसत.

सन १८९३ साली वयाच्या २४ व्या वर्षी महात्मा गांधी हे भारतीय व्यावसायिकांचे न्यायालयीन सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेले होते. मित्रांनो, त्याकाळी दक्षिण आफ्रिका ही एक इंग्रजांची वसाहत होती. त्याठिकाणी कार्य करण्यासाठी महात्मा गांधीजींनी आपल्या आयुष्याची २१ वर्षे घालविली.

दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना आपल्या प्रिय महात्मा  गांधीजींनी आपले राजकीय दृष्टीकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व अशा त्यांनी स्वतःतील अनेक कौशल्यांचे बारकाईने धडे गिरविले. महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत असताना, समाजात अस्तित्वात असलेल्या विकलांगपणाची जाणीव झाली.

भारतीय संस्कृती आणि धर्म यामध्ये असणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्येपासून आपण भरपूर दूर आहोत याची जाणीव त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये झाल्यानंतर, त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये राहून भारतीय लोकांचे प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेत उद्योग, व्यवसाय आणि इतर कामधंद्यासाठी त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या भारतीय लोकांचे प्रश्न समजावून घेवून त्यांचे निराकरण करण्याचा गांधीजींनी आपला प्रयत्न सुरू केला.

खरंतर मित्रहो, आपल्या बापूंची अशी धारणा होती की; अशा पद्धतीने जर आपण भारतवासियांचे प्रश्न समजावून घेतले, तरच आपण खऱ्या दृष्टीने भारत देशाला समजून घेऊ. पण, याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींना गंभीरपणे वांशिक वर्ण भेदाचा सामना देखील करावा लागला.

त्याठिकाणी भारतीय लोकांना देण्यात येणारी अपमान जनक वागणूक त्यांनी स्वतः अनुभवली. एके दिवशी महात्मा गांधीजी रेल्वेचा प्रवास करीत असताना, त्यांच्याजवळ पहिल्या वर्गाचे तिकीट असताना सुद्धा त्यांना ‘पीटर मारित्झबर्ग’ येथील रेल्वे स्थानकावर एका रेल्वे अधिकाऱ्याने खाली उतरवले आणि महात्मा गांधीजींना तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले होते.

यावेळी, महात्मा गांधीजींनी तिसऱ्या वर्गाच्या रेल्वेच्या डब्यात स्वतः बसण्यास त्या अधिकाऱ्याला  नकार दिला. तेंव्हा, त्या अधिकाऱ्याने गांधीजींना गाडी बाहेर ढकलून दिले आणि जोरदार ढकल्याने गांधीजी रेल्वेच्या खाली पडले. मित्रांनो, त्यादिवशी आपल्या बापूंनी संपूर्ण रात्र फलाटावर काढली होती.

  • नक्की वाचा: छत्रपती शिवाजी महाराज भाषण 

बापूंच्या मनात आलं असत तर ते त्या इंग्रज अधिकाऱ्याला धडा शिकवू शकले असते. परंतु, सुडाच्या भावनेतून कोणाला शिक्षा करणे असा त्यांचा कधीच हेतू नव्हता. आपले महात्मा गांधीजी हे अहिंसावादी असल्याने,  केवळ अन्यायकारक व्यवस्था बदलणे हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीजींना अशा अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

शिवाय, त्यांना त्याठिकाणी असणाऱ्या समाजातील अनेक मुळ समस्येंचा देखील अनुभव आला होता. उदाहरणार्थ, प्रवाशांना वाट काढून न दिल्यामुळे, महात्मा गांधीजी यांना मार देण्यात आला होता.

गांधीजी हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना, त्यांना हॉटेलमधून देखील बाहेर काढून देण्यात आलं होत. याशिवाय, महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतील ‘डर्बन’ या शहरात वकिली करीत असताना, त्यांना तेथील न्यायाधीशांनी डोक्यावरील टोपी काढून ठेवण्याचा आदेश दिला होता. परंतु, आपल्या बापूंनी यावेळी सुध्दा न्यायाधीशाचा आदेश अमान्य केला.

अश्या प्रकारचे अनेक अनुभव आपल्या पाठीशी घेतल्यानंतर, महात्मा गांधीजींनी एक सामाजिक नागरिक म्हणून ब्रिटीश राज्यातील आपल्या लोकांच्या समस्यांविषयी प्रश्न मांडण्यास सुरुवात केली. भारतीय लोकांवर होणारे अन्याय, अत्याचार आणि आपलं स्वतःचं सामाजिक स्थान निर्माण करण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला.

गांधीजींच्या मनात असे विचार चालू असताना, सन १९०६ साली मात्र ब्रिटीश सरकारने दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू केला.

त्यावेळी बापूंनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आपलं तेथील मुक्काम वाढवलं आणि भारतीय नागरिकांना राजकीय व सामाजिक हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देखील दिली. त्याचबरोबर, गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेच्या ब्रिटीश सरकारकडे भारतीय लोकांच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला.

मित्रांनो यावेळेस, आपल्या बापूंनी आपल्या अहिंसेच्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग केला होता. सन १८९४ साली त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वेगवेगळ्या समाजात विखुरलेल्या भारतीय नागरिकांना एकत्रित करून ‘नाताळ भारतीय कॉन्ग्रेस‘ नावाचा एक राजकीय पक्ष देखील स्थापन केला.

यानंतर, सन ९ जानेवारी १९१५ साली काँग्रेसचे उदारमतवादी नेता “ गोपाळ कृष्ण गोखले ” यांच्या सल्ल्याने महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून आपल्या मायदेशी परत आले. खरंतर मित्रहो, महात्मा गांधीजी “गोपाळ कृष्ण गोखले” यांना आपले राजकीय गुरु मानत असतं.

ज्यावेळी महात्मा गांधीजी भारतात परत आले होते, त्यावेळी त्यांनी स्वतःची राष्ट्रवादी नेता, तसेच संयोजक आणि संघटक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर  ख्याती मिळवली होती. आपल्या राजकीय कार्याला सुरुवात करण्याच्या प्रारंभी महात्मा गांधीजी  यांच्या मनावर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या संयम, संतुलन आणि कोणत्याही व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करणे, यासारख्या विचारांचा प्रभाव पडला होता.

मित्रहो, गोपाळ कृष्ण गोखले हे त्यावेळेला “भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे” अध्यक्ष होते. भारत देशात परत आल्यानंतर महात्मा गांधीजी देशाच्या विविध भागात जावून तेथील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. शिवाय, आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांचे दु:ख आणि दारिद्र्य पाहून महात्मा गांधीजी हे स्वतः देखील दु:खी झाले होते.

अहमदाबाद जवळील साबरमती नदीच्या काठी असलेल्या एका आश्रमात महात्मा गांधीजी  वास्तव्य करू लागले.

“साबरमतीचे संत तुम्ही महान, सत्य-अहिंसेचे शस्त्र तुम्ही आम्हांला दिले छान. सर्व जगी अहिंसेचे पुजारी म्हणून, ठेवू आम्ही पहिला तुमचा मान!”

भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांनी अहिंसावादी सत्याग्रह करण्याचे एक नवीन अभिनव तंत्र स्वतःच्या अंगी अंगिकारले. महात्मा गांधीजी हे अहिंसेचे पुजारी असल्याने इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी असहकार, अहिंसा आणि शांततामय या तीन तत्वांचा आपल्यामध्ये अवलंब केला होता.

सन १९१९ साली पंजाबमधील जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणामुळे देशातील लोकांच्या मनात इंग्रज सरकारबद्दल क्रोधाचा भडका उडाला होता. त्यामुळे, या घटनेच्या निषेधार्थ भारत देशात जागोजागी मोर्चे निघाले होते आणि ते मोर्चे दडपून काढण्यासाठी इंग्रज सरकारला खूप दमछाक देखील करावी लागली होती.

  • नक्की वाचा: राजमाता जिजाऊ भाषण मराठी

अशावेळी, महात्मा गांधीजी यांनी जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणी इंग्रज सरकारचा निषेध केला. खरंतर मित्रांनो, सहकार चळवळ सुरु करण्यामागे महात्मा गांधीजींचा असा हेतू होता की, भारतातील ब्रिटीशांचे राज्य हे केवळ भारतातील लोकांच्या सहकार्यावर अबलंबून आहे;

त्यामुळे, जर भारतीयांनी त्यांना विरोध केला तरच त्यांचे शासन पूर्णपणे ढासळून जाईल. मित्रहो, अशा हेतूने महात्मा गांधीजींनी जनतेला आपल्या असहकार आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले. असहकार आंदोलन सुरू असताना, सन १९२० साली  लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि टिळकांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय सभेचे संपूर्ण नेतृत्व महात्मा गांधीजी यांच्याकडे आले.

अशा प्रकारे, असहकार चळवळीनुसार आपल्या देशातील नागरिकांनी शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा आणि महाविद्यालये यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मित्रहो, असे केल्याने इंग्रज सरकार आपल्याला स्वातंत्र्य देण्याबाबत काही पाऊले उचलतील; असे आपल्या  राष्ट्रीय सभेच्या सदस्यांना वाटत होते.

परंतु, गांधीजींचे हे आंदोलन फार काळ टिकू शकले नाही. सन १९२२ साली उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपुर जिल्हाच्या चौरीचौरा या भागात एका शांततापूर्ण चाललेल्या मिरवणुकीवर पोलीसांनी गोळीबार केला.

पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे असहकार चळवळीत सहभागी असलेल्या नागरिकांना खूप राग आला आणि या रागातच घडलेल्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी तेथील एक पोलीस चौकी जाळून टाकली. या जाळपोळीत एक पोलीस अधिकारी व २२ पोलीस ठार झाले. या घटनेची माहिती जेंव्हा बापूंना समजली, तेंव्हा  त्यांना खुप वाईट वाटलं आणि ते एकदम अस्वस्थ झाले.

गांधीजींना वाटू लागलं की, आपण असहकार आंदोलन सुरु करून लोकांना अहिंसेच्या मार्गावर चालायला लावलं. परंतु, अहिंसेच्या मार्गावर चालणे इतक सोप नाही शिवाय, तसे करणे सर्वांनाच शक्य होणार नाही, म्हणून महात्मा गांधी यांनी आपली असहकार चळवळ मागे घेतली. मित्रहो, याशिवाय सन १९१८ साली गुजरातमधील खेडा या गावात सतत पडलेल्या पावसामुळे संपूर्ण गाव हे दुष्काळग्रस्त झालं होत. तेथील पिकांची अवस्था खूपच वाईट होती.

खेडा या गावात अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा इंग्रज सरकार मात्र भारतीय शेतकऱ्यांकडून सक्तीने शेतसारा वसूल करीत होते. परिणामी, या सगळ्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अजुन खूप बिकट, गुंतागुंतीची आणि वाईट बनली. अशावेळी, महात्मा गांधीजींनी त्याठिकाणी राहत असणाऱ्या लोकांसाठी एक आश्रम उभारला आणि आपल्या लहान मोठ्या सर्व अनुयायांना एकत्रित केलं.

याशिवाय, महात्मा गांधीजींनी गावातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आपल्या विश्वासात घेतले. शेतकऱ्यांना महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांकडे यावेळी शेतसारा न भरण्याचा आदेश दिला, तेंव्हा सन १९१८ साली शेतकऱ्यांनी शेतसारा बंदीची चळवळ सुरु केली आणि महात्मा गांधीजींना या चळवळीचे अध्यक्ष बनवले.

महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांनी येथील  शेतकऱ्यांच्या समस्येसंबंधी इंग्रज सरकारसोबत चर्चा केली.

शेवटी, ब्रिटीश सरकारने त्यांची मागणी मान्य करून, तुरुंगात कैद्य केलेल्या सर्व लोकांची सुटका केली. या चळवळीमुळे महात्मा गांधीजींची प्रसिद्धी संपूर्ण जगभर पसरली होती. याशिवाय, इसवी सन  १९१४ साली झालेल्या पहिल्या महायुद्धानंतर आपल्या भारत देशात खूप महागाई वाढली होती आणि या वाढलेल्या महागाईत अहमदाबाद येथील कामगारांनी वेतनवाढीकरीता गिरणी मालकांकडे विनंती केली.

परंतु, कामगारांची ही मागणी मान्य करण्यात आली नाही. यावेळी, महात्मा गांधीजींनी स्वतः त्याठिकाणी जावून संप पुकारला आणि तिथे ते उपोषणाला बसले. महात्मा गांधीजींसोबत गिरणी कामगार देखील उपोषणाला बसले होते. शेवटी, महात्मा गांधीजींच्या या अहिंसावादी आंदोलनासमोर गिरणी मालकांनी हार पत्करली आणि गिरणी कामगारांना वेतनवाढ दिली.

पण मित्रांनो, अशा या थोर आणि जागृत विचारवंताचा मृत्यू मात्र खूप भयानक पद्धतीने आणि अनपेक्षितपणे झाला.

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजी दिल्ली येथील बिर्ला बागेत आपल्या सहकाऱ्यांसोबत फिरत असताना ‘नथुराम गोडसे’ या व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. महात्मा गांधीजी यांना गोळी लागताच ते जमिनीवर कोसळले. मित्रहो, गांधीजींच्या मृत्यूबद्दल लोकांची अशी धारणा आहे की, महात्मा गांधीजी यांनी मृत्युपूर्वी आपल्या मुखातून ‘हे राम’ असे उद्गार काढले होते.

सन १९४९ साली महात्मा गांधीजींच्या मारेकऱ्याला आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यात आले व त्यांच्यावर खटला देखील चालविण्यात आला. भारत सरकारने आपल्या कायद्यानुसार नथुराम गोडसे या खूनीला आणि त्यांच्या साथीदारांना फाशीची शिक्षा देण्याचे ठरवले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी, समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि निवारण्यासाठी, जातीभेदेची दरी कमी करण्यासाठी या महामानवाने खरच खूप मोलाची कामगिरी केली होती. म्हणूनच, आपल्या भारत देशात आज सुद्धा भारतीय जनतेच्या मनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याबद्दल भरपूर आदर आहे.

खरंतर, महात्मा गांधीजींनी केलेल्या या उत्कृष्ठ  कामगिरीबद्दल महात्मा गांधीजी हे फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण विश्वात देखील ओळखले जातात. म्हणूनच मित्रांनो, केवळ भारत देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आदर्शवादी असणाऱ्या महात्मा गांधीजींचा जन्मदिन हा सगळीकडे अहिंसादिन म्हणून साजरा केला जातो. अशा या महान राष्ट्रपित्याला माझा कोटी कोटी प्रणाम! जय हिंद! जय भारत!

“ज्यांनी लिहीली, पारतंत्र्य मुक्तीची गाथा. त्या राष्ट्रपित्याच्या, चरणी ठेविते आज माथा!”

– तेजल तानाजी पाटील

बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या mahatma gandhi speech in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “महात्मा गांधी भाषण मराठी” speech on mahatma gandhi in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mahatma gandhi jayanti speech in marathi   या mahatma gandhi bhashan marathi article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mahatma gandhi marathi bhashan माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण mahatma gandhi bhashan marathi madhe या लेखाचा वापर mahatma gandhi information in marathi speech असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

(2024) महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi

महात्मा गांधी भाषण मराठी  व Mahatma Gandhi Jayanti bhashan Marathi

महात्मा गांधी भाषण मराठी - Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi : मित्रांनो भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी देशाच्या स्वतंत्र लढ्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. गांधीजींनी देशाला अहिंसेच्या मार्गाने स्वतंत्र मिळवून देण्यासाठी कार्य केले. आज भारतच नव्हे तर जगभरात गांधीजींचे अहिंसावादी विचार प्रसिद्ध आहेत. 

या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती भाषण मराठी शेअर करीत आहोत. Mahatma Gandhi Speech in Marathi शाळा कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसाठी फार उपयोगाचे आहे. तर चला महात्मा गांधी जयंतीच्या भाषणाला सुरूवात करूया...

mahatma gandhi speech in marathi

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी - Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi

भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांच्या जन्म 2 ऑक्टोंबर 1869 साली गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला. 2 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून सुद्धा पाळला जातो. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई असे होते. पुतळाबाई या करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी होत्या आणि महात्मा गांधी हे त्यांचे शेवटचे अपत्य होते. महात्मा गांधींना ब्रिटिश शासनाविरुद्ध भारतीय राष्ट्रीय आंदोलनाचे नेता व भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते.

महात्मा गांधीजींची आई पुतळाबाई अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या स्त्री होत्या. त्यांच्या या स्वभावाचा परिणाम लहान मोहनदास यांच्यावर झाला आणि याच मूल्यांनी पुढे जाऊन त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मोहनदास स्वभावाने अहिंसा, शाकाहार आणि विविध धर्मातील मूल्यांना मानणारे होते.  

सन 1883 मध्ये साडे तेरा वर्षाच्या वयात त्यांचे लग्न 14 वर्षाच्या कस्तुरबा यांच्याशी करण्यात आले. ज्यावेळी मोहनदास पंधरा वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या प्रथम मूल ने जन्म घेतला. परंतु काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. मोहनदास यांचे वडील करमचंद गांधी चे सुद्धा त्याच वर्षी 1885 मध्ये निधन झाले. यानंतर मोहनदास आणि कस्तुरबा यांना चार अपत्य झालीत.

मोहनदास यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर मध्ये तर हायस्कूल चे शिक्षण राजकोट मध्ये पूर्ण झाले. शैक्षणिक स्तरावर मोहनदास एक सामान्य विद्यार्थी होते. सन 1887 मध्ये त्यांनी मॅट्रिक ची परीक्षा अहमदाबाद हून उत्तीर्ण केली. या नंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याना लंडन जाऊन बॅरिस्टर होण्याचा सल्ला दिला. वर्ष 1888 मध्ये मोहनदास युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी व बॅरिस्टर बनण्यासाठी इंग्लंडला गेले. जून 1891 मध्ये तीन वर्षांनी गांधीजी भारतात परत आले. भारतात आल्यावर त्यांना आपल्या आईच्या मृत्यूची सूचना मिळाली. यानंतर त्यांनी बॉम्बे येथे वकिली करणे सुरू केले. सन 1893 साली दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय केस ची वकिली करण्याच्या करार त्यांनी स्वीकारला. 24 वर्षाचे असताना गांधीजी दक्षिण आफ्रिकेत पोहोचले. दक्षिण आफ्रिकेत त्यांना गंभीर वंशवाद आणि नस्ल भेदाचा सामना करावा लागला. या सर्व घटना त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण वळण बनल्या, दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होत असलेल्या अन्यायाला पाहून त्यांच्या मनात इंग्रजीशासना अंतर्गत असलेल्या भारतीयांच्या सन्मान आणि आपली स्वतःची ओळख यासंबंधित प्रश्न उठायला लागले. यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना राजनेतिक आणि सामाजिक अधिकार प्राप्त करणे आणि त्यासाठी संघर्ष करण्यासाठी प्रेरित केले.

वर्ष 1914 मध्ये गांधीजी भारतात परत आले. या काळात ते एक राष्ट्रवादी नेता म्हणून प्रसिद्ध होऊन गेले होते. भारतात आल्यावर त्यांनी चंपारण व खेडा सत्याग्रह, खिलाफत आंदोलन, असहयोग आंदोलन, स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह, हरिजन आंदोलन, भारत छोडो आंदोलन असे एक न अनेक आंदोलने करून लोकांना इंग्रज शासनाविरुद्ध अहिंसेच्या मार्गाने एकत्रित केले. 9 ऑगस्ट 1942 ला गांधीजींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले. भारत छोडो स्वतंत्रता आंदोलन त्या काळातील सर्वात मोठे आणि शक्तिशाली आंदोलन बनून गेले. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने स्वातंत्र्यसेनानी मारले गेले. यानंतर ब्रिटीश सरकारने महात्मा गांधी समेत अनेक मोठमोठ्या काँग्रेसच्या नेतांना तुरुंगात टाकून दिले. भारत छोडो आंदोलनाचा भारतीय जनतेवर खूप मोठा परिणाम झाला. लोक संघटित होऊन गेले. यानंतर दुसरे विश्व युद्धाच्या समाप्तीपर्यंत ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य करण्याचे संकेत देऊन दिले आणि अशा पद्धतीने सर्व नेत्यांना मुक्त करत भारताला स्वातंत्र्य मिळाले.

30 जानेवारी 1948 महात्मा गांधी दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये एका प्रार्थनेला संबोधित करायला जात होते. संध्याकाळी 05:17 ला नाथूराम गोडसे नावाच्या एका कट्टरपंथी व्यक्तीने त्यांच्या छातीत तीन गोळ्या मारून त्यांची हत्या केली. असे मानले जाते की महात्मा गांधी यांचे शेवटचे शब्द 'हे राम' असे होते. यानंतर नाथूराम गोडसे व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला व 1949 मध्ये त्या सर्वांना मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली.

महात्मा गांधी भाषण मराठी - M ahatma Gandhi jayanti bhashan Marathi

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो. आज 2 ऑक्टोंबर म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी जमलो आहोत. आज मी तुम्हाला महात्मा गांधी बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही विनंती.

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला. 

गांधीजींनी आपले सुरुवातीचे शिक्षण ब्रिटिश शासित भारतात पूर्ण केले. आणि नंतर उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले. शिक्षण झाल्यानंतर ते आपल्या पत्नी कस्तुरबांसोबत दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तेथे अनेक वर्षे वास्तव्य केले. त्यांनी तेथे साधे जीवन व्यतीत केले पण दक्षिण आफ्रिकेत राहणा-या भारतीयांविरुद्धच्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याच्या चळवळींमध्ये ते सक्रिय राहिले.

अन्याय आणि बेकायदेशीर गोष्टींविरुद्धचा त्यांचा संघर्ष आफ्रिकेतील सविनय कायदेभंग चळवळीपासून सुरू झाला, ज्याची सुरुवात १९०६ साली झाली. तेथे भारतीयांना बेकायदेशीर कर भरण्यास भाग पाडले जात होते. चळवळीदरम्यान, दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या अनेक भारतीयांना गोळ्या घालून ठार करण्यात आले आणि अनेकांवर गंभीर अत्याचार करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आठ वर्षे लढा दिला. 

दक्षिण आफ्रिकेत एकदा रेल्वेने प्रवास करत असताना एका युरोपियन प्रवाशाला त्यांची जागा न दिल्यामुळे गांधीजींना फर्स्ट क्लासच्या डब्यातून बाहेर हकलण्यात आले. येथूनच त्यांच्या मनामधील स्वातंत्र्याची मशाल पेटली आणि भारताला मुक्त करण्यासाठी ते कायमचे भारतात परतले.

मायदेशी परतल्यावर त्यांनी १९१७ मध्ये चंपारण सत्याग्रहाद्वारे स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली. त्यानंतर ते १९२० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. महात्मा गांधींचा लढा सत्याग्रह, अहिंसक चळवळ, सत्य आणि कायदेशीर लढाईने सुरू झाला.

यानंतर त्यांनी काही प्रमुख लोकांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ, भारत छोडो आंदोलन, असहकार चळवळ अशा अनेक चळवळी सुरू केल्या. १९३० मध्ये त्यांनी दांडी यात्रा काढली, हजारो भारतीयांनी या मोहिमेत सामील होऊन सुमारे ३८५ किमी पायी प्रवास केला आणि मिठाचा सत्याग्रह केला. भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या चळवळीने लोकांना एकत्र आणले.

गांधीजींना त्यांच्या आयुष्यातील अनेक टप्प्यांवर ब्रिटिश सरकारने तुरुंगात टाकले, परंतु त्यांनी कधीही हिंसेचा मार्ग निवडला नाही, उलट दिवसभर संप आणि आमरण उपोषण करून त्यांनी त्यांचा लढा सुरू ठेवला. 

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आणि भारतीय लोकांच्या जीवनातील गांधीजींचे योगदान निर्विवाद आहे. आपल्याला एक स्वतंत्र देश मिळवून देण्यासाठी त्यांच्या पूर्ण समर्पणाचे आपण भारतीय खरोखरच ऋणी आहोत. ब्रिटिश राजवटीच्या तावडीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केला. त्यांच्या संघर्षाचे फळ म्हणून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यांनी हे स्वातंत्र्य हिंसाचाराने नव्हे तर अहिंसेने व शांततेच्या मार्गाने मिळवून दिले. 

२०० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीत, अनेक भारतीयांनी ब्रिटीश राजवट आपले भाग्य म्हणून स्वीकारली होती आणि सर्व अयशस्वी प्रयत्नांसह स्वातंत्र्य मिळविण्याचा विचार सोडला होता. मात्र महात्मा गांधींनी भारतीय लोकांच्या हृदयात पुन्हा स्वातंत्र्याची आग पेटवली आणि भारतमातेसाठी लढण्यास प्रेरणा दिली. 

भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या निखळ समर्पणाच्या पलीकडे ते उच्च मूल्यांचे व्यक्तिमत्त्वही होते. त्यांच्या जीवनातून खूप काही शिकण्यासारखे आहे. महात्मा गांधींनी खादीच्या पोशाखात आयुष्य जगत स्वतःचे कपडे कातले आणि कधीही अन्न वाया घालवले नाही. त्यांनी केवळ आपल्या जीवनातच स्वदेशी गोष्टी वापरल्या नाहीत तर भारतीयांना परदेशी कापड न वापरता स्वदेशी कापड व इतर गोष्टी वापरण्याचे आवाहन केले. खादी स्वीकारण्याच्या त्यांच्या चळवळीमुळे लोकांनी खादी वापरण्याची सुरुवात केली आणि विदेशी वस्तूंचा बहिष्कार केला. 

या व्यतिरिक्त, महात्मा गांधींनी स्वच्छतेच्या मुद्द्यांवरही लक्ष केंद्रित केले. आज आपल्या भारताच्या पंतप्रधानांनीसुद्धा बापूंची शिकवण पुढे नेण्यासाठी आणि भारतातील लोकांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे.

आणखी एक गोष्ट ज्याबद्दल गांधीजीनी अगदी विलक्षण काम केले ते म्हणजे त्या काळातील अस्पृश्यांसोबत होणारी वागणूक. तथाकथित अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ते कठोर होते. त्यांनीच अशा लोकांना ‘हरिजन’ म्हणून संबोधित केले आणि त्यांना देवाची मुले ही पदवी दिली. लोकांनी त्यांच्यासाठी इतर अपमानास्पद शब्द वापरू नयेत आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी त्यांनी १९३३ मध्ये हरिजन, हरिजन सेवक आणि हरिजन बंधू नावाची नियतकालिके गुजराती, हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित केली.

स्वातंत्र्यानंतर, त्यांनी हिंदू-मुस्लिमांच्या ऐक्यासाठी काम केले. १५ जून २००७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने गांधी जयंती हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून घोषित केला. दरवर्षी, भारताचे पंतप्रधान प्रत्येक भारतीयात जिवंत असलेल्या त्यांच्या आत्म्याला पुष्प अर्पण करून आणि प्रार्थना करून राज घाटावर श्रद्धांजली अर्पण करतात. 

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अहिंसेचे आणि शांततेच्या मार्गाचे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात खूप मोठे योगदान असले तरी इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची उपेक्षा करता येणार नाही. अशा महान स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे आपण ऋणी आहोत. गांधी जयंती हा भारतातील लोकांना प्रेरणा देणारा आणि कोणाविरुद्धही  हिंसा न करता आपली मूल्ये जपत अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा संदेश देणारा दिवस आहे. महात्मा गांधींचे जीवन आपल्यासाठी एक धडा आहे. त्यांच्या आयुष्यातून शिकणे आणि त्यांनी सांगितलेल्या मूल्यांचा आपल्या आयुष्यात समावेश करणे व दररोज त्याचा सराव करणे महत्वाचे आहे. त्यांच्या शिकवणीने मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर सारख्या अनेक महान व्यक्तींच्या जीवनावर प्रभाव टाकला आहे. मला विश्वास आहे की, त्यांच्या जीवनातून आपणसुद्धा बऱ्याच गोष्टी शिकू आणि त्यांची शिकवण पुढे घेऊन जाऊ.

महात्मा गांधी भाषण मराठी  Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi : तर मंडळी वरील लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत 2 महात्मा गांधी जयंती भाषण शेअर केलेत. आशा आहे आपणास ही भाषणे उपयोगी ठरली असतील. Mahatma Gandhi Bhashan Marathi हे शाळा कॉलेज मध्ये होणाऱ्या भाषण स्पर्धेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. आपण या भाषणाला आपल्या पद्धतीने एडिट करून भाषणसाठी वापरू शकतात. धन्यवाद..

1 टिप्पण्या

Thank you so much it,s very much important .. and very useful speech 👌👍👍.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

mahatma gandhi speech in marathi pdf

infinitymarathi

  • मराठी निबंध
  • उपयोजित लेखन
  • पक्षांची माहिती
  • महत्वाची माहिती
  • भाषणे
  • कोर्स माहिती

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी 2024 | mahatma gandhi speech in marathi

 महात्मा गांधी जयंती भाषण मराठी 2024 | महात्मा गांधी जयंती भाषण निबंध| mahatma gandhi jayanti bhashan marathi | mahatma gandhi speech marathi pdf.

mahatma gandhi speech in marathi:नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आज आपण महात्मा गांधीजी यांच्या विषयी मराठी भाषण बघणार आहोत हे  गांधीजींच्या जयंती मराठी भाषण वर्ग ५ ते 10 चे विद्यार्थी आपल्या भाषणाची तयारी साठी वापरू शकता.हे mahatma gandhi jayanti bhashan marathi भाषण तुम्ही गांधी जयंती तसेच पुण्यतिथी या दिवशी तुम्ही आपल्या शाळेमध्ये सादर करू शकतात चला तर मग सुरू करूयात mahatma gandhi speech in marathi भाषणाला.

महात्मा गांधी जयंती पुण्यतिथी भाषण मराठी |  mahatma gandhi bhashan marathi speech

महात्मा गांधी जयंती भाषण | mahatma gandhi bhashan marathi 2023 | Mahatma gandhi speech in marathi 

mahatma gandhi jayanti bhashan marathi:सन्माननीय व्यासपीठ,आदरणीय अध्यक्ष,महोदय उपस्थित गुरुजन वर्ग तसेच माझ्या छोट्या आणि मोठ्या बांधवांना माझा सप्रेम नमस्कार, मी आजच्या दिवशी मी तुम्हाला सर्वांचे लाडके असे ज्यांना आपण बापू म्हणून ओळखतो यांच्या विषयी दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तरी ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी मी अपेक्षा करतो

खादी मेरी शान आहे करम मेरी पूजा है सच्चा मेरा करम और हिंदुस्तान मेरी जान है

अहिंसा आणि सत्याचा मार्ग ने बलाढ्य शत्रूला आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर विजय मिळवणाऱ्या महात्मा गांधीजींना माझा शत शत प्रणाम

आधुनिक काळातील युगप्रवर्तक नेते म्हणून महात्मा गांधीजी यांचे नाव घेतले जाते. भारतीय जनमाणसात यांचा खूप मोठा प्रभाव होता. हे आपल्याला गांधीयुग यावरून दिसून येते.

महात्मा गांधीजी यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला. महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते.त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी.तरआईचे नाव पुतळीबाई असे होते.

त्यांची आई ही धार्मिक प्रवृत्तीची होती,त्यांचे बालपण हे धार्मिक वातावरणात गेले म्हणूनच गांधीजी लहानपणापासूनच धार्मिक विचाराचे होते हे आपल्याला दिसून येते. त्यांचे वडील पोरबंदर येथे दिवाण म्हणून कार्यरत होते.त्या काळात बालवयातच लग्न करण्याच्या प्रथेमुळे महात्मा गांधी यांचे लग्न वयाच्या 13 व्या वर्षी झाले. त्यांचे लग्न कस्तुरबा कपाळ या यांच्याशी बालविवाह झाला.

महात्मा गांधीजी हे लहानपणापासूनच लाजाळू स्वभावाचे  व हुशार  होते. महात्मा गांधी 1887 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. व शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी  1888 मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथे गेले तिथे त्यांनी बॅरिस्टर पदवी संपादन केली. 

उच्च शिक्षण संपादन करून 1891 मध्ये ते भारतात परतले व त्यांनी प्रथमच भारतामधील राजकोट येथे वकिली सुरू केली . व पुढे लवकरच ते एका हिंदी कंपनीचे वकील म्हणून 1893 मध्ये दक्षिण आफ्रिका येथे गेले.

व्यापार व कामधंदा निमित्त भारतीय अनेक लोक दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक झालेले होते, परंतु तेथील गोऱ्या लोकांनी भारतीय लोकांवर वर्णभेदाच्या आधारे अत्यंत अन्याय जुलूम चालवला होता. ते सर्व लोक अतिशय कठीण अवस्थेत हालाखीचे जीवन जगत होते. याच प्रकारची वर्तणूक गांधीजी यांच्यासोबत सुद्धा घडले होते. 

त्यांच्यावर होत असलेला हा अन्याय महात्मा गांधींना कळताच त्यांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचे ठरवले. या सरकारी अन्यायाविरुद्ध व जुलूमशाही विरुद्ध त्यांनी अहिंसक मार्गांनी लढत त्यांनी प्रथमच सत्याग्रहा चा प्रयोग करण्याचे ठरवले.

 गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनात अनेक भारतीय सहभागी झाले त्यांच्या आंदोलनामुळे दक्षिण आफ्रिकेची सरकार सुद्धा झुकली होती. भारतीयांना मानवी हक्क देण्यात आले.अशाप्रकारे महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिका मध्ये सत्याचा प्रथम प्रयोग करून अहिंसक मार्गाने अत्याचारी व जुलमी सत्तेला नमवले.

9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतील विजय संपादन करून भारतात परत ले यानंतर 1917 मध्ये त्यांनी  बिहारमधील चंपारण येथील शेतकऱ्यांना त्यांचे हक्क व जुलमी कर याच्याविरुद्ध तसेच मजुरांची होणारी पिळवणूक याच्याविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा देऊन तो जिंकला.गुजरातमधील खेडा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्येवर त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला या दोन सत्याग्रहामुळे त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली.

याप्रमाणे त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध भारत छोडो, सायमन गो बॅक, आणि असे अनेक सत्याग्रह केले. 1942 च्या चले जाव या स्वातंत्र आंदोलन चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केले होते.महात्मा गांधीजी आणि भारतातील अनेक स्वातंत्र्यसैनिक यांच्या प्रयत्नांना अनेक अखेर यश येऊन अखेर 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्य मध्ये एक गांधीजींनी योगदान दिले.

नोबल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी  गांधीजी यांना महात्मा ही उपाधी दिली तसेच सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. भारतातील जनता त्यांना प्रेमाने बापू असे म्हणत.

गांधी जी हे सत्य अहिंसेचे पुजारी होते. सत्य आज परमेश्वर परमेश्वर सत्य आहे असे त्यांचे म्हणणे होते. सत्याचा शोध घेणे म्हणजेच परमेश्वराचा शोध घेणे होय असे त्यांनी म्हटले होते.

सत्याग्रह हे गांधीजींचे शस्त्र होते.सत्याग्रही गांधीजी नि संपूर्ण जगाला दिलेली महत्त्वाची देणगी आहे.अन्याया व  शोषणाविरुद्ध केलेल्या आत्मिक शक्तीचा वापर म्हणजे सत्याग्रह होय असे त्यांनी म्हटले आहे.गांधीजी म्हणतात अहिंसेच्या मार्गाने च्या शत्रुलाही प्रेमाने जिंकता येते, अहिंसा हे अन्याय व असत्य या विरुद्ध लढण्याची सर्वात प्रभावी साधन आहे.

सर्व जगाला गांधीजींनी अहिंसेचा मार्ग दाखवला म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय 2 ऑक्टोंबर हा अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसे याच्या द्वारे करण्यात आली. 

दिल्लीतील बिर्ला भवनामध्ये गांधीजी फिरत असताना त्यांच्यावर नथुराम गोडसे यांच्या द्वारे गोळ्या चालवण्यात आल्या व यातच महात्मा गांधीजी चा मृत्यू झाला.या थोर राष्ट्रीय युगप्रवर्तक नेत्याला आदरांजली देण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो.आजच्या दिवशी गांधीजींच्या पावन प्रतिमेला व त्यांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते जय हिंद जय भारत.

  • नक्की वाचा  26 january speech marathi

Team infinitymarathi

Posted by: Team infinitymarathi

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या, telegram group.

Telegram Group

  • essay in marathi
  • information in marathi
  • marathi speech
  • course information in marathi
  • advertising in Marathi

गैरवर्तनाची तक्रार करा

हा ब्लॉग शोधा.

  • जून 2024 4
  • मे 2024 2
  • एप्रिल 2024 3
  • मार्च 2024 20
  • जानेवारी 2024 2
  • डिसेंबर 2023 1
  • नोव्हेंबर 2023 4
  • ऑक्टोबर 2023 2
  • ऑगस्ट 2023 2
  • जून 2023 1
  • मे 2023 1
  • एप्रिल 2023 1
  • फेब्रुवारी 2023 2
  • जानेवारी 2023 2
  • ऑक्टोबर 2022 1
  • मे 2022 4
  • एप्रिल 2022 1
  • मार्च 2022 3
  • फेब्रुवारी 2022 5
  • जानेवारी 2022 1
  • डिसेंबर 2021 2
  • नोव्हेंबर 2021 2
  • ऑक्टोबर 2021 2
  • सप्टेंबर 2021 3
  • ऑगस्ट 2021 6
  • जुलै 2021 5
  • जून 2021 8
  • मे 2021 16
  • मार्च 2021 2
  • फेब्रुवारी 2021 6
  • जानेवारी 2021 1

Social Plugin

Follow us on google news.

  • https://news.google.com/publications/CAAqBwgKMMz2owswj4G8Aw?ceid=IN:en&oc=3

Featured Post

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

click here to get information

Menu Footer Widget

  • Privacy policy
  • Terms and Conditions

MarathiGyaan - Essay, Speech, Stories and More

महात्मा गांधी मराठी भाषण | Mahatma Gandhi Speech in Marathi | MarathiGyaan

महात्मा गांधी मराठी भाषण - mahatma gandhi speech in marathi.

आज मी तुमच्या करीत लिहले आहे महात्मा गांधी मराठी भाषण (mahatma gandhi speech in marathi) . आशा करतो तुम्हाला नक्की आवडेल.हे गांधी जयंती (gandhi jayanti speech in marathi) साठी सर्वोत्तम भाषण आहे.

mahatma gandhi speech in marathi

महात्मा गांधी मराठी भाषण

“ बेष्णव जन तो तेणे कहिए जो पीरपराई जाणेरे..."

महात्माजींच्या बाबतीत हे अगदी शंभर टक्के खरे आहे. म्हणून प्रथमच महात्माजींना; आपल्या * राष्ट्रपित्याला ' त्यांच्या जयंती निमित्त मी शतप्रणाम करुन... त्यांना आदरांजली वाहतो.

इथे उपस्थित माझ्या गुरुजनांना देखील माझे सादर वंदन. माझ्या दोस्तांनो, .

आपल्या हातून रोज नव्या-नव्या चुका होतच असतात. त्यासाठी आपले आई-बाबा, शाळेत शिक्षक आपल्याला वेळीच समज देतात. कधी कधी ( नव्हे बरेचदा ! ) आपल्याला त्यांचा रागही येतो. पण आपण तर सामान्य मुले आहोत. आपण त्यांचे ऐकलेच पाहिजे. कसे ? त्यासाठी महात्माजींच्या बालपणातील दोन घटना सांगतोय. त्यावेळी ते होते एक सामान्य विद्यार्थी, ' मोहनदास करमचंद गांधी. '

शाळेत जाणाऱ्या मोहनदासला शाळेत वाईट मित्रांची संगत लागली. अवघ्या सहाव्या वर्षी खोटे बोलणे, चोरी करणे, विडी ओढणे या वाईट गोष्टी. त्याच्या हातून घडल्या. वडिलांच्या हे लक्षात येताच त्यांनी मोहनला हटकले... खडसावले ! मोहनलाही आपली चूक ध्यानात आली. त्याने बडिलांजवळ झाल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली. पुन्हा असे न करण्याचा “ खरे बोलण्याचा ' निश्चय केला. आणि अभ्यासात स्वत:ला गाढून घेतले.

मग इतके की स्वत:ला लिहिता न येणारा इंग्रजी शब्द ' शेजारच्या मित्राच्या वहीत बघून लिही. ' असे शिक्षकांनी सांगून सुद्धा त्या शब्दाची कॉपी केली नाही: चुकीचे लिहिले. नंतर तो शब्द. त्याचे स्पेलिंग प्रयत्नपूर्वक पाठ करुन मगच आपल्या वहीत उतरवले. ही घटना आहे राजकोट येथील शाळेत ते शिकत असतानाची... आणि ते स्पेलिंग होते ' केटल ' या शब्दाचे. याच निश्चयी व निग्रही स्वभावामुळेच केवळ “ सत्य ' ब ' अहिंसा, या दोन तत्त्वांच्या जोरावर गांधींजींनी अन्यायाविरुद्ध लढा दिला व जुलमी इंग्रज सत्तेला प्रतिकार केला.

वास्तविक पाहता गांधीजींचा जन्म गुजरातमधील * पोरबंदर ' या गावात झाला. वडिल पोरबंदरच्या महाराजांचे दिवाण होते. सारे काही व्यवस्थित होते. मॅट्रिक नंतर पुढील शिक्षणासाठी ते परदेशात गेले. नि बॅरिस्टर होऊनच भारतात परतले. हायकोर्टात ( मुंबईच्या ) वकिली करु लागले. एका. खटल्याच्या निमित्ताने त्यांना दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. आणि ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. दक्षिण आफ्रिकेत भारतीय लोकांवर होणारे अत्याचार, अन्याय त्यांना पाहवले नाहीत. तिथेच त्यांनी यासाठी तेथील भारतीयांना एकत्र केले. त्यांना त्यांच्यावर होत न असलेल्या अन्यायाची जाणीव करुन दिली. त्यासाठी सत्याग्रह पुकारला आणि भारतीयांना देय असलेले न्याय्य हक्क व सवलती मिळवून देऊन मगच भारतात परतले.

भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही हे त्यांच्या लक्षात आले. ब्रिटिश सत्ता भारतातल्या भारतीयांच्या हक्कांवर, स्वातंत्र्यावर गदा आणत . होती. आपले भारतीय जात-पात, स्पृश्य-अस्पृश्य च्या विळख्यात अडकले होते. प्रथम सर्व भारतीयांना मनाने एकत्र आणण्यासाठी हे जाती भेद मिटविण्यासाठी गांधींजींनी प्रयत्न सुरु केले. अस्पृश्यांना ते हरिजन म्हणूनसंबोधत. त्यांना न्याय हक्क, योग्य सामाजिक दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.

सर्व जनता एक करण्यासाठी गांधीजी पदयात्रा काढत. त्यात त्यांच्या पत्नी कस्तुरबाही असत. या दरम्यान गांधीजींच्या लक्षात आली ती भारतातील ठराविक स्तरावरील दारिक्र्यावस्था ! घालायला कपडे नाहीत म्हणून न येणारे उपाशी असलेले 'हे पीडित पाहून; या महात्म्याने प्रतिज्ञा केली “ जोवर देशातील प्रत्येकाला स्वतःच्या अगावर घालायला कपडा नसेल तो वर मी ही केवळ पंचा नेसेन '...' जोवर प्रत्येकाला दोन वेळची रोजी-रोटी मिळणार नाही तोवर मी देखील एकवेळ ( दिवसातून ) उपासच करेन. ' मग त्यांनी या वस्त्यांतून चरखे वाटले. स्वत: सूत कातून त्याचे वस्त्र गुंडाळण्याचा स्वावलंबनाचा आदर्श या लोकांपुढे... आपल्यापुढे ठेवला आणि याच घटनेने ते राष्ट्राचे कैवारी " राष्ट्रपिता ' बनले.

साबरमती नदीकाठी आश्रम बांधून गांधीजी साधेपणाने राहू लागले. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी ' यंग इंडिया ' हे साप्ताहिक चालवीत होते. सत्य, अहिंसा आणि असहकार याच्या बळावरच स्वातंत्र्य मिळावे याचा आग्रह त्यांनी धरला होता.

भारतीय स्वातंत्र्याचा लढा दिवसेंदिवस ऊग्र बनत चालला होता. इंग्रज सरकार आता या लढ्याने त्रासले होते. हेराण झाले होते. याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोलमेज परिषद इंग्लंड येथे भरविण्यात आली होती. गांधीजी त्या परिषदेस हजर होते. तेथेही कणखर आणि स्पष्टपणे त्यांनी भारताची बाजू मांडली. भारतात परत आल्यावर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबईला ब्रिटीश सरकारला “चले जाव “ चा आदेश गांधीजींनी दिला. आणि स्वातंत्र्यलढ्याने आपला अंतिम टप्पा गाठला. यश स्वातंत्र्य आता समोर दिसत होते. स्वातंत्र्य सूर्याची लख्ख किरणे आता भारतावर पडणार होते पण भारतातील हिंदू मुसलमानांचे तंटे काही केल्या मिटत नव्हते. गांधींजींनी हे तंटे मिटविण्यासाठी जिवाचे रान केले पण व्यर्थ.

ब्रिटिशांनी याच संधीचा फायदा घेतला. भारताला स्वातंत्र्य बहाल केले पण त्याची हिंदुस्थान - पाकिस्तान अशी फाळणी करुन. या फाळणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हिंदु-मुसलमान सर्वांवरच अत्याचार झाले. सर्वांचेच खूप नुकसान झाले. गांधींजींचे स्वप्न होते... एकसंघ भारताचे... ते तुटले... गांधीजी व्यथित झाले. .. दुःखी झाले... नोखाली येथे त्यांनी एक शांतियात्रा देखील काढली. मनामनांतील दुवे साधणारा तो एक अखेरचा प्रयत्न होता. स्वातंत्र्यलढ्यात समर्पित जीवन जगणाऱ्या या सेनापतीने शेवट पर्यंत आपली तत्वे सोडली नाहीत. “ सत्याचे प्रयोग ' नावाचे आत्मकथन पुढील पिढीसाठी दिशादर्शक म्हणून त्यांनी लिहून ठेवले.

अशा-या महात्म्याला एका तरुणाने ३० जानेवारी १९४८ रोजीं सायंप्रार्थथेला जातेवेळी छातीवर गोळ्या घालून संपविले. जातेवेळी शांतपणे महात्म्याच्या तोंडून शब्द उमटले, हे राम! .

धन्यवाद!

तुम्हाला महात्मा गांधी मराठी भाषण (mahatma gandhi marathi bhashan) कस वाटलं हे कंमेंट करा. आणि आपल्या मित्रां सोबत share करा.

लोकमान्य टिळक मराठी भाषण

सावित्रीबाई फुले मराठी भाषण

१५ ऑगस्ट मराठी भाषण

बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण

You might like

Post a comment, contact form.

InstaPDF

Mahatma Gandhi Speech in Marathi PDF

PDF Name
No. of Pages
PDF Size
Language
PDF Category
Last Updated
Source / Credits
Uploaded ByPradeep

Mahatma Gandhi Speech in Marathi

Mahatma Gandhi Speech in Marathi

महात्मा गांधीचा जन्मदिवस, ज्याला आपण आदराने गांधी जयंती म्हणतो. महात्मा गांधी यांच्या व्यंग्यरहित आणि मार्गदर्शक जीवनाच्या मंत्रांची नंतर पिढीला केंद्रभूत केलेली शिक्षणं महत्त्वाची आहे. त्यांच्या जीवनाच्या शिक्षणांची जाणीव म्हणजेच सत्य, सरालता व प्रेमाभरलेली जीवनपद्धती. हे लेख तुम्हाला महात्मा गांधी ज्ञानाच्या प्रश्नांचे उत्तरपत्रीत अनुभवायला मदत करणार असलेल्या एका मराठीतील गांधी जयंती भाषणामध्ये मार्गदर्शन करतो.

महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण मराठी मध्ये बघणार आहोत. दरवर्षी आपण 02 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजींची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करतो. या दिवशी आपल्या शाळेत, कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अशावेळी भाषण स्पर्धा आयोजित केली जाते. किंवा आपल्याला कर्याक्रमात भाषण सूत्रसंचालन करावे लागते.

Mahatma Gandhi Speech Marathi (महात्मा गांधी जयंती भाषण मराठी)

सर्वांना शुभ सकाळ!

आज स्पष्टपणे आपल्या भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अडचण आहे, आवडलेले, “बापू” असं म्हणतलेले महात्मा गांधी यांचा जन्मदिन. तब्बल 100 वर्षांपूर्वी, सत्य आणि अहिंसेच्या सिद्धांतांना पाळणारे या महान बुद्धिवंताचा जन्म येथे झाला होतं.

महात्मा गांधी, सत्य, अहिंसा आणि प्रेम – यांचा मार्गदर्शन करणारे एक साधारण व्यक्ती होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात अभ्यासलेला ‘अहिंसा’ चा मार्ग, तोच आजही विश्वातील कोणत्याही संघर्षातील सर्वात मार्गदर्शक घाणरा मार्ग आहे.

त्यांच्या अत्यंत साधारण जीवनलेल्या प्रेरणाच्या अनुपेक्षा, त्यांनी स्वंयाच्या या अध्वनी सत्याच्या शोधात डोळ्यांत पाहिलेली अचूक ज्योत अजूनही आधुनिक भारताच्या जनतेसाठी म्हणजेच ‘सत्य’ असलेला मोठा प्रकाशमय तारा आहे.

महात्मा गांधी म्हणजे ‘महान आत्मा’ या अर्थाने विश्वास केलेले आहे. म्हणजे सत्याच्या मार्गावर चालणारे एक साधारण माणूस, पण आपल्या अद्वितीय विचारांमुळे जगात प्रेरणा देणारा एक महान व्यक्तित्व. त्यांच्या दृष्टांतामुळे जगातल्या लोकांना सजीव आशा आहे की ते आपले अन्यायी म्हणजेच निर्वासित समाजाशी सामान्य माणूसांच्या मुकामी शांतीने सामना करू शकतील.

आज ‘गांधी जयंती’ ह्या एका खास दिवशी आपल्याकडे येथे जमलेल्या सर्व स्थानकांची वर्वरती केली जाईल. त्या या कोमल स्त्री माणूसाच्या देखील आपल्या अस्थिर मनाला अवघडी सूचना मिळतात. ह्या अस्ल्याच सोप्या माणूसाने तेथे एक धडसा केला की जगभरातील कोणताही शक्तीस्पद दल, इतिहासातील कोणत्याही प्रतिष्ठित सामाजिक चालवलीच्या विरुद्धता.

अस्या महान व्यक्तित्वाच्या जन्मदिवसी आम्ही स्तब्ध होतो, जून्या शास्त्रीय काळातील गडकिच्या उड्यात असलेल्या ह्या अभूतपूर्व स्वरुपाचा आँवाटा घेतो.

जगातल्या सर्व लोकांना ‘गांधी जयंती’च्या हार्दिक शुभेच्छा!

मराठीत गांधी जयंती भाषण

सत्य, अहिंसेचे धडे दिले जगतास ! कोटी कोटी वंदन करतो मी बापू तुम्हास !!

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या मित्र-मैत्रिणींनो.! आपण दरवर्षी 02 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती मोठ्या उत्साहात, आनंदात साजरी करतो. या दिवशी आपले थोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असतो. त्यांचा जन्म 02 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. लोक त्यांना प्रेमाने बापूजी म्हणत.

महात्मा गांधीजींनी सत्य अहिंसेचा मार्ग अवलंबून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत खूप मोलाचे योगदान दिले. त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता न मानता सामाजिक समानतेला जास्त महत्त्व दिले. साधी राहणी व उच्च विचार यास प्राधान्य दिले.

जगाला अहिंसेची शिकवण गांधीजींनी दिल्याने जगभर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद! जय हिंद! जय भारत!

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी

जीवन जगले देशासाठी… देशच होता त्यांचा प्राण ! स्वतंत्र केली भारतमाता… ते गांधीजी फार महान !!

सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य साहेब, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींना.! मी सावित्री… सर्वांना माझा नमस्कार !

आज मी आपणांसमोर भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख नेते, सत्य व हिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे, ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती.

महात्मा गांधी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा, हातात काठी आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळाबाई असे होते.

महात्मा गांधी हे वकील होते. महात्मा गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर, माध्यमिक शिक्षण राजकोट, वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले.

त्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. ते भारतीयांना अपमानास्पद वागणूक देत होते. गरीब जनतेवर अनन्य असे अत्याचार करीत होते. म्हणून गांधीजींनी अन्यायविरुद्ध लढण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सत्य, अहिंसा या तंत्राचा वापर केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले.

त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलने केली. चले जाओ, भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना पळवून लावले. अखेर अनेक प्रयत्नांमुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.

महात्मा गांधीजींची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. त्यांनी देशवासीयांना सत्य, अहिंसा व मानवतेची शिकवण दिली. त्यांनी महात्मा व राष्ट्रपिता अशा पदव्या प्राप्त केल्या. लोक प्रेमाने त्यांना बापू म्हणत.

दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची प्राणज्योत मालवली. परंतु आजही त्यांचे कार्य व विचार आपणास प्रेरणा देतात. शांततेच्या मार्गाने लढा देणाऱ्या अशा या थोर देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम!

जय हिंद! जय भारत!

2nd Page of Mahatma Gandhi Speech in Marathi PDF

Mahatma Gandhi Speech in Marathi PDF Download Free

REPORT THIS If the purchase / download link of Mahatma Gandhi Speech in Marathi PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

SIMILAR PDF FILES

mahatma gandhi speech in marathi pdf

” महात्मा गांधी ” वर मराठी भाषण Mahatma Gandhi Speech In Marathi

Mahatma Gandhi Speech In Marathi आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एक सुंदर आणि सरळ असे भाषण देत आहेत . हे भाषण तुम्हाला गांधी जयंतीनिमित्त खूप उपयोगी पडेल. तरी आपण या भाषणाचा आस्वाद घ्यावा हीच विनंती !

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक साहेब , वंदनीय गुरुजन , शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो – आपणा सर्वांना हार्दिक अभिवादन !

आपणा सर्वांना माहितच आहे की आज आपण महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. म्हणून आज मला इथे भाषण देण्यासाठी सर्वात मोठी संधी मिळाली याबद्दल मी गुरुजनांचे आभार मानतो आणि भाषणाला सुरुवात करतो.

महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव कोणाला माहित नाही, म्हणजे मोहन दास करमचंद गांधी बापू म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर येथे 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळीबाई होते, जी एक धार्मिक व श्रद्धाळू स्त्री होती.

महात्मा गांधी यांचे लग्न वयाच्या 13 व्या वर्षी कस्तुरबा सोबत झाले.. मॅट्रिक आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर ते कायद्याच्या अभ्यासात प्रवेश घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे ते बॅरिस्टर म्हणून पात्र ठरले व ते आपल्या मूळ देशात परत आले.

त्यांनी मुंबईतच सराव सुरू केला आणि त्यानंतर ते राजकोटला रवाना झाले पण तो यशस्वी वकील होऊ शकला नाही. एकदा त्याने एका प्रकरणात दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. तेथे तो सुमारे दोन दशके राहिला आणि त्या काळात तो भारतीयांची घृणास्पद स्थिती पाहत असे.

तेथे त्यांनी नेटल इंडियन कॉंग्रेसची पायाभरणी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भारतीय मदत कायदा सन 1914 मध्ये मंजूर झाला. अर्थातच यामुळे त्यांना बऱ्याच भारतीयांच्या परिस्थितीत सुधारणा करण्यात मदत झाली. 1915 साली ते भारतात परतले आणि कॉंग्रेसशी युती केली.

त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन नावाची महान ऐतिहासिक चळवळही सुरू केली. त्यांच्या नेतृत्वातच कॉंग्रेसने ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक कायद्याचा विरोध करण्यासाठी असहकार आणि अहिंसा अशी चळवळ सुरू केली. मग त्याच्या पाश्र्वभूमीवर एक महत्त्वाचा दांडी मार्च झाला जो मीठाच्या कायद्याचे पालन करीत नाही आणि तिचा नाश झाला.

1942 मध्ये त्यांनी ‘भारत छोडो’ आंदोलन नावाची आणखी एक चळवळ सुरू केली आणि ब्रिटीशांना आपला देश सोडण्यास भाग पाडले. शेवटी, त्याच्या यशस्वी नेतृत्वात भारताने 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य परत मिळवले.

दुबळ्या शरीराचा कमळ कापडात घातलेला माणूस इतरांवर जादूचा प्रभाव घालवू शकतो. कोणताही अडथळा न आणता साधे जीवन जगण्याचा त्याचा विश्वास होता. सेवाग्राम नावाचे एक गरीब गाव हे त्याचे स्थान होते आणि तिथे जीवन त्यांनी जगले होते.

30 जानेवारी 1948 रोजी संध्याकाळी नथूराम गोडसे यांनी बिर्ला भवनच्या ठिकाणी तीन गोळ्या घालून त्यांना ठार मारले. त्यावेळी ते नेहमीप्रमाणे प्रार्थना सभा घेण्यासाठी तेथे आले होते. यमुना नदीच्या काठावर त्यांची मृत्यूची विधी पार पडली.

सध्याच्या काळात राजघाट येथे त्यांची समाधी स्थळ, जगभरातील लोकांचे तीर्थस्थान बनले आहे. अशाप्रकारे त्याने जगासाठी आपले पदचिन्हे सोडले, जे या शब्दाच्या खर्‍या अर्थाने मानवतेचे सेवक होते.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

My Country India Essay In Marathi

My School Essay In Marathi

Srushti Tapase

Leave a comment cancel reply.

mahatma gandhi speech in marathi pdf

FreeCourseDrive

Get Free PDF From Google Drive

Mahatma Gandhi Speech in Marathi PDF Download

' src=

You can download the Mahatma Gandhi Speech in Marathi PDF for free by using the direct link provided below on the page.

Mahatma Gandhi’s birthday, celebrated as Gandhi Jayanti, holds significant reverence in our hearts. His profound teachings, characterized by a life guided by truth, simplicity, and love, continue to inspire generations. The essence of his philosophy resonates deeply, emphasizing the importance of leading a life filled with compassion and integrity. Gandhi Jayanti serves as a poignant reminder of Mahatma Gandhi’s enduring legacy and the principles he stood for. It is a day of reflection, remembrance, and celebration, marked by various events and activities that honor his contributions to the Indian independence movement and his advocacy for nonviolent resistance.

In the spirit of commemorating Gandhi Jayanti, speeches delivered in Marathi play a vital role in conveying the essence of Mahatma Gandhi’s teachings to a broader audience. These speeches serve as a platform to delve into Gandhi’s wisdom, shedding light on his philosophy of ahimsa (nonviolence), satya (truth), and sarvodaya (welfare of all). As we gather each year on the 2nd of October to pay tribute to Mahatma Gandhi, the atmosphere is filled with reverence and enthusiasm. Schools and workplaces come alive with various programs and initiatives dedicated to honoring his memory and spreading his message of peace and harmony.

Speech competitions held on Gandhi Jayanti provide a platform for individuals to express their thoughts on Gandhi’s life and legacy. Participants share insights on his principles, recount his struggles, and highlight the relevance of his teachings in today’s world. These speeches serve as a means to inspire others to embody the values that Mahatma Gandhi championed throughout his life. In essence, Gandhi Jayanti serves as a beacon of light, guiding us to embrace the virtues of truth, simplicity, and love in our daily lives. Through speeches delivered in Marathi and other languages, we have the opportunity to delve deeper into the profound teachings of Mahatma Gandhi, gaining a deeper understanding of his philosophy and the enduring impact of his legacy on society. Let us continue to honor his memory and strive to uphold the principles he held dear, fostering a world built on compassion, equality, and justice.

Mahatma Gandhi Speech Marathi (महात्मा गांधी जयंती भाषण मराठी)

  • Today marks a significant milestone in Indian history as we celebrate the birthday of Mahatma Gandhi, affectionately known as “Bapu.” Nearly a century ago, this eminent thinker, who embodied the principles of truth and non-violence, was born, leaving an indelible mark on our nation’s fabric.
  • Mahatma Gandhi, a humble individual who epitomized truth, non-violence, and love, paved the way for the path of ‘Ahimsa’ during India’s struggle for independence, setting a timeless example for movements worldwide.
  • Despite his unassuming lifestyle, the unwavering determination reflected in his eyes as he pursued the ultimate truth remains a beacon of ‘Truth’ for contemporary India, illuminating the way for generations to come.
  • The moniker ‘Mahatma Gandhi,’ meaning ‘Great Soul,’ encapsulates the essence of an ordinary man treading the path of truth, yet emerging as a towering figure whose profound ideas continue to inspire the global community. His visionary outlook instills a sense of hope among people worldwide, empowering them to confront societal injustices with the resilience of the common man.
  • On this auspicious occasion of ‘Gandhi Jayanti,’ let us reflect on the profound wisdom imparted by this revered figure. Even in his simplicity, Mahatma Gandhi’s teachings resonate deeply with our restless minds, offering profound insights into navigating life’s complexities. His actions, seemingly gentle yet transformative, stand as a testament to the unparalleled impact of peaceful resistance, transcending the might of worldly powers and the grandeur of historical movements.
  • Today, as we gather to honor Mahatma Gandhi’s legacy, let us draw inspiration from his enduring spirit and unwavering commitment to truth and non-violence. His life serves as a timeless reminder of the power of simplicity, love, and unwavering dedication to noble ideals, guiding us towards a more compassionate and just society.

Facebook SDK (Plugin)

मराठी भाषण

महात्मा गांधी जयंती भाषण | महात्मा गांधी निबंध मराठी | mahatma gandhi jayanti speech in marathi | mahatma gandhi easy in marathi pdf

mahatma gandhi speech in marathi pdf

महात्मा गांधी जयंती भाषण २०२२| महात्मा गांधी निबंध मराठी | mahatma gandhi jayanti speech in marathi 2022| mahatma gandhi easy in marathi pdf 

नमस्कार विद्यार्थी शिक्षक बंधू आज आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाची भूमिका पार पाडणारी महान व्यक्तिमत्व महात्मा गांधी यांच्या विषयी थोडक्यात माहिती मराठीत बघणार असून सदर माहितीचा उपयोग आपण महात्मा गांधी भाषण ( mahatma gandhi bhashan marathi ) महात्मा गांधी निबंध ( mahatma gandhi marathi nibandh pdf ) सूत्रसंचालन कविता चारोळ्या यासाठी करू शकते महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती च्या आधारे आपण दहा ओळीचे भाषण छोट्या मुलांसाठी देऊ शकता चला तर महात्मा गांधी जयंती भाषण निबंध सूत्रसंचालन सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2022.

🎯 महात्मा गांधी जयंती भाषण ( mahatma gandhi bhashan marathi ) महात्मा गांधी निबंध ( mahatma gandhi marathi nibandh ) pdf

mahatma gandhi jayanti speech in marathi 2022

🎯 महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण

 आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजनवर्ग, आणि येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो.... 

स्वदेशीचा केला स्वीकार 

स्वतंत्रतेचा मिळवून दिला अधिकार 

ब्रिटीशांना केला प्रतिकार 

गांधीजी आहेत सत्य, अहिंसेचा आविष्कार.

महात्मा गांधी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हण जे डोळ्यावर चष्मा, हातात काठी आणि अंगावर परिधान केलेले पांढरे शुभ्र वस्त्र ! महात्मा गांधी हे आपल्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना 'महात्मा' ही उपाधी दिली आहे.

दरवर्षी २ ऑक्टोंबर हा दिवस आपण गांधी जयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद, गांधी हे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळीबाई हे होते.

महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ "महान आत्मा " असा आहे. त्यांची आई अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या स्त्री होत्या. त्यांच्या या स्वभावामुळे गांधीजी - वर त्याचा प्रभाव पडला.  इसवी सन १९८८ साली आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्या नंतर महात्मा गांधीजी उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला गेले. उच्च शिक्षणानंतर त्यांनी 'इनर टेंपल' या गावी राहून, भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा भरपूर अभ्यास केला. अशा प्रकारे महात्मा गांधींनी लंडनविदयापीठातून आपले वकिली शिक्षण पूर्ण केले. महात्मा गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम केले. त्यांनी इंग्रजां विरुद्ध असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मीठाचा सत्याग्रह, भारत छोड़ो आंदोलन इ. महत्त्वपूर्ण आंदोलने केली. चले जावू, भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना पळवून लावले .अखेर अनेक प्रयत्नांमुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र्य झाला. पण स्वतंत्र भारतात फार काळ राहण्याचे भाग्य महात्मा गांधीजींना लाभले नाही. 30 जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींचा दुर्देवी अंत झाला. आज जरी गांधीजी या जगात नसले तरी त्यांचे विचार कायम आपल्या सोबत आहेत.

धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.

अशा आहे की महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती भाषण निबंध सूत्रसंचालन चारोळी तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडले असल्यास नक्की शेअर करा.

🎯  महात्मा गांधी जयंती भाषण मराठी pdf 🎯  महात्मा गांधी जयंती सूत्रसंचालन मराठी pdf

Q. महात्मा गांधीचे यांचे पूर्ण नाव काय आहे?

Ans-महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते.

Q. महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी कोणी दिली ?

Ans-रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना 'महात्मा' ही उपाधी दिली आहे.

Q. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते?

Ans- महात्मा गांधी यांच्या आईचे नाव पुतळीबाई हे होते.

टिप्पणी पोस्ट करा

Top post ad, below post ad, आपल्या फेसबुक ला लाईक करा , all containe are protected by dmca, आमच्या नवीन पोस्ट्स, लोकप्रिय पोस्ट्स.

११ वी प्रेवेश प्रक्रिया २०२४ २५ रजिस्ट्रेशन कसे करावे  |  11th Registration And Part 1 filling step by step 2024-25

११ वी प्रेवेश प्रक्रिया २०२४ २५ रजिस्ट्रेशन कसे करावे | 11th Registration And Part 1 filling step by step 2024-25

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२३ | 11th admission process maharashtra 2023 - 24  |  Registration and part 1 2 last date

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२३ | 11th admission process maharashtra 2023 - 24 | Registration and part 1 2 last date

१२ वी निकाल उद्या २०२४ | maharesult.nic.in 2024 hsc result | 12th hsc result 2024 maharashtra board

१२ वी निकाल उद्या २०२४ | maharesult.nic.in 2024 hsc result | 12th hsc result 2024 maharashtra board

इ १० वी निकाल 27 मे ला अखेर परिपत्रक आले  |  SSC board Result 2024 std 10 maharashtra board

इ १० वी निकाल 27 मे ला अखेर परिपत्रक आले | SSC board Result 2024 std 10 maharashtra board

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण साठी मुदतवाढ 2023 |  varishtha and nivad shreni prasikshan nondani registration 2023 24

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण साठी मुदतवाढ 2023 | varishtha and nivad shreni prasikshan nondani registration 2023 24

इ १०वी निकाल वेबसाईट महाराष्ट्र बोर्ड २०२४ |  SSC board Result 2024 std 10 maharashtra board website 2024

इ १०वी निकाल वेबसाईट महाराष्ट्र बोर्ड २०२४ | SSC board Result 2024 std 10 maharashtra board website 2024

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2024 25 भाग 2 कसा भरावा | 11th Online Admission Part 2 Filling 2024 25 | College cut off last year

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2024 25 भाग 2 कसा भरावा | 11th Online Admission Part 2 Filling 2024 25 | College cut off last year

११ वी प्रवेशप्रक्रिया २०२३ या वर्षीची सर्व कॉलेजची कट ऑफ लिस्ट | 11th Admission 2023-24 Cutoff list pdf Mumbai Pune nagpur nashik Amravati | fyjc mumbai 11th admission cut off list 2022 23

११ वी प्रवेशप्रक्रिया २०२३ या वर्षीची सर्व कॉलेजची कट ऑफ लिस्ट | 11th Admission 2023-24 Cutoff list pdf Mumbai Pune nagpur nashik Amravati | fyjc mumbai 11th admission cut off list 2022 23

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण माहिती चुकल्यास काय करावे ? varishtha vetan shreni registration website certificate download

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण माहिती चुकल्यास काय करावे ? varishtha vetan shreni registration website certificate download

आनंदाची बातमी ☺️ RTE 25 प्रवेशप्रक्रिया परत पूर्वीप्रमाणे सुरू होणार ! 14 मे पासून परत रजिस्ट्रेशन करावे लागणार ! आता प्रायव्हेट शाळेत सुद्धा घेता येणार प्रेवेश 2024 24 | RTE 25 admission new update 2024 25

आनंदाची बातमी ☺️ RTE 25 प्रवेशप्रक्रिया परत पूर्वीप्रमाणे सुरू होणार ! 14 मे पासून परत रजिस्ट्रेशन करावे लागणार ! आता प्रायव्हेट शाळेत सुद्धा घेता येणार प्रेवेश 2024 24 | RTE 25 admission new update 2024 25

  • शैक्षणिक माहिती
  • 10 वी 12 वी चे वेळापत्रक 2023
  • 10 वी आजच्या हिंदी पेपरची संभाव्य उत्तरपत्रिका
  • 10 वी निकाल कॅल्क्युलेटर 2021
  • 10 वी प्रश्नपत्रिका 2022 मराठी Pdf Download
  • 10 वी विज्ञान प्रयोगवही सोडवलेली 2021
  • 10 वी श्रेणी विषयांची परीक्षा शाळा स्तरावर
  • 10-12 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा
  • 10वी मराठी माध्यम पुस्तके डाउनलोड करा
  • 10th maharashtra board result 2021
  • 11 वी CET 2021 संपूर्ण माहिती
  • ११ वी Cet प्रवेशप्रक्रिया पुन्हा सुरू
  • 11 वी CET सराव प्रश्नपत्रिका pdf
  • 11वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 2021
  • ११वी प्रवेशप्रक्रिया वेळापत्रक
  • 11वी CET फॉर्म दुरुस्ती कशी करावी
  • 11th CET Timetable Exam Pattern
  • 12 वी निकाल 2021 तारीख महाराष्ट्र
  • 12 वी महाराष्ट्र बोर्डच्या परीक्षा रद्द
  • 12 वी मूल्यमापन परिशिष्ट Excel Sheet
  • 12 वीसीबीएसई निकाल वेबसाईट
  • 12th mark percentage calculator 2021
  • 12th Result 2021 website official
  • 25% अभ्यासक्रम कमी 2021-22
  • 6100 शिक्षकांची महाभरती
  • ८ जून 2022 ला लागणार १२ वीचा निकाल
  • 9 वी निकाल सॉफ्टवेअर 2021
  • अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रजिस्ट्रेशन प्रोसेस
  • आकारीत मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 प्रश्नपत्रिका 2021
  • इ १ ली ते ८ वी निकाल एक्सेल सॉफ्टवेअर 2021-2022
  • इ 10 वी 12 वी वेळापत्रक 2022 महाराष्ट्र बोर्ड
  • इ १० वी १२ वीच्या परीक्षा शुल्क फिस परत मिळणार
  • इ 10 वी चे मूल्यमापन 2021 कसे असेल
  • इ 10 वी जलसुरक्षा 25 % कमी झालेला अभ्यासक्रम
  • इ 10 वी जलसुरक्षा पुस्तक 2021
  • इ 10 वी निकाल कसा चेक करावा
  • इ 10 वी मूल्यमापन एक्सेल शीट
  • इ 10 वी व इ 12 वी निकाल 2022 तारीख जाहीर
  • इ 10 वी साठी प्रश्नपेठी 2021
  • इ 10वीच्या विद्यार्थ्यांना इ 9वीत किती गुण मिळाले कसे चेक करावे?
  • इ 11 वी प्रवेशप्रक्रिया वेळापत्रक 2022-23
  • इ 5 वी निकाल सॉफ्टवेअर 2021
  • इ 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परिक्षेची नवीन तारीख
  • इ 9 वी चा रिझल्ट Excel सॉफ्टवेअर
  • इ ९वी १०वी जलसुरक्षा मूल्यमापन पद्धत २०२१
  • इ पहिली प्रवेशाचे वय महाराष्ट्र 2022-23
  • इ.१० सर्व परीशिस्थ Excel शीट २०२१
  • इयत्ता नववी द्वितीय सत्र परीक्षा 2022
  • इयत्ता व विषय निहाय २५ % कमी झालेला अभ्यासक्रम
  • घटक चाचणी 2 प्रश्नपत्रिका 2022
  • टीईटी परीक्षेचे नवीन सुधारित वेळापत्रक
  • ध्वज गीत मराठी लिहलेले
  • निष्ठा २.० प्रशिक्षण माध्यमिक महाराष्ट्र
  • प्रथम घटक चाचणी 2022-23 pdf
  • प्रथम घटक चाचणी क्रमांक १ २०२२
  • बारावी बोर्ड सीबीएसई परीक्षा रद्द
  • महा स्टुडंट अँप डाउनलोड व रजिस्ट्रेशन कसे करावे
  • महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी
  • मोबाईल मध्ये CATALOG तयार करा
  • म्युकर मायकोसिस म्हणजे काय
  • म्युकर मायकोसिस लक्षण
  • वर्णनात्मक नोंदी 2022
  • वार्षिक नियोजन २०२२ -२३
  • वार्षिक वेतनवाढ excel सॉफ्टवेअर
  • शालेय पोषण आहार (MDM) software 2022
  • शालेय शुल्कामध्ये १५ टक्के कपात GR
  • शाळा सुरू करण्याची संपूर्ण पूर्वतयारी
  • शिष्यवृत्ती ३०० सराव प्रश्नपत्रिका
  • शिष्यवृत्ती परीक्षा 2021 उत्तर सूची
  • शिक्षक अभियोग्यता चाचणी अभ्यासक्रम २०२२
  • शिक्षक अभियोग्यता चाचणी प्रश्नपत्रिका pdf
  • शिक्षक दिन मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन
  • शिक्षक पात्रता परीक्षा (Tet) 2021 प्रश्नपत्रिका pdf
  • संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका
  • संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका प्रथम सत्र
  • सेतू अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका
  • सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी PDF
  • सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 उत्तरे
  • सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 pdf
  • सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी ची उत्तरे
  • सेतू अभ्यासक्रम रिझल्ट शिट
  • सेतू अभ्यासक्रम pdf
  • सेतू अभ्यासक्रम pdf 2022
  • सेतू अभ्यासक्रम PDF 2022 23
  • सेतू चाचणी क्रमांक २ मराठी उर्दू माध्यम
  • BMC पायाभूत चाचणी गुणदान तक्ते
  • MAHA TET 2021 Syllabus in Marathi Pdf
  • MHT CET 2021 registration procedure
  • NAS प्रश्नपत्रिका pdf 2021

भाषण सूत्रसंचालन संग्रह

  • मराठी भाषण
  • राजमाता जिजाऊ भाषण मराठी
  • लोकमान्य टिळक भाषण मराठी
  • 15 ऑगस्ट/स्वातंत्र्य दिन मराठी भाषण
  • 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • प्रजासत्ताक दिन भाषण मराठी
  • मराठी राजभाषा दिन सूत्रसंचालन
  • शिवाजी महाराज भाषण मराठी
  • 'मकर संक्रांति' 'निबंध' मराठी
  • 15 August speech in English
  • 20 मार्च जागतिक चिमणी दिवस मराठी माहिती भाषण निबंध सूत्रसंचालन
  • 26 जानेवारी तयारी 2022
  • 26 जानेवारी भाषण मराठी
  • 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन मराठी भाषण
  • lokmanya tilak speech in english
  • अक्षय तृतीया मराठी माहिती दिली 2021
  • अण्णाभाऊ साठे मराठी भाषण
  • अहिल्याबाई होळकर जयंती शुभेच्छा संदेश
  • अहिल्याबाई होळकर मराठी माहिती भाषण
  • आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी माहिती निबंध
  • ईद मुबारक मराठी माहिती शुभेच्छा संदेश व्हाट्सअप्प सेट्स
  • ईस्टर संडे ची मराठी माहिती भाषण निबंध
  • एप्रिल फुल चा इतिहास मराठी माहिती
  • ऑगस्ट क्रांती दिन मराठी भाषण
  • ओमीक्रोनची एकूण रुग्ण संख्या
  • कोजागिरी पौर्णिमा मराठी माहिती निबंध भाषण
  • गणपती बाप्पाची आरती मराठी
  • गुड फ्रायडे मराठी माहिती
  • गुडीपाडवा माहिती इतिहास मराठी
  • गुरुपौर्णिमा भाषण मराठी
  • गुरुपौर्णिमा मराठी माहिती निबंध भाषण
  • छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी मराठी माहिती
  • जागतिक आदिवासी दिन भाषण
  • जागतिक आरोग्य दिन माहिती मराठी
  • जागतिक एड्स दिन 2021 मराठी माहिती
  • जागतिक क्षयरोग दिन मराठी माहिती
  • जागतिक जल दिन मराठी माहिती भाषण
  • जागतिक पर्यावरण दिन निबंध मराठी माहिती भाषण
  • जागतिक महिला दिन भाषण
  • जागतिक महिला दिन मराठी भाषण
  • जागतिक महिला दिन सूत्रसंचालन
  • जागतिक लोकसंख्या दिन भाषण
  • जागतिक साक्षरता दिवसाची मराठी माहिती भाषण
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी
  • द्रौपदी मुर्मू मराठी माहिती pdf
  • नेताजी सुभाष चंद्र बोस मराठी भाषण
  • पृथ्वी दिवस मराठी माहीती
  • फातिमा शेख मराठी माहिती भाषण
  • बालदिन भाषण मराठी
  • बालदिनावर मराठी निबंध भाषण
  • बाळासाहेब ठाकरे जयंती शुभेच्छा
  • बिरसा मुंडा भाषण निबंध मराठी
  • बुद्ध पोर्णिमा माहिती मराठी
  • बुद्ध पौर्णिमा मराठी माहिती
  • बैल पोळा सणांची मराठी माहिती निबंध भाषण
  • भाऊबीज मराठी माहिती 2021
  • भारतीय लष्कर दिन मराठी माहिती
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण
  • मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठी भाषण
  • मराठी भाषा दिन निबंध भाषण मराठी माहिती
  • मराठी राजभाषा दिन भाषण
  • महात्मा गांधी जयंती पुण्यतिथी भाषण मराठी
  • महात्मा गांधी जयंती भाषण
  • महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी मराठी भाषण
  • महात्मा ज्योतिबा फुले माहिती मराठी
  • महापरिनिर्वाण दिन भाषण निबंध व संदेश
  • मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2021
  • मैत्री दिवस 2021 शुभेच्छा मराठी
  • यशवंतराव चव्हाण जयंती माहिती
  • यशवंतराव चव्हाण मराठी भाषण
  • रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 2021
  • राम नवमी मराठी माहिती
  • राष्ट्रीय गणित दिवस मराठी माहिती
  • राष्ट्रीय विज्ञान निबंध मराठी
  • राष्ट्रीय शिक्षक दिन मराठी माहिती निबंध भाषण
  • राष्ट्रीय शेतकरी दिन दिवस मराठी निबंध भाषण
  • राष्ट्रीय सुरक्षा दिवस मराठी भाषण निबंध कविता स्लोगन
  • वटपौर्णिमा मराठी निबंध भाषण
  • वसुबारस मराठी माहिती
  • वाचन प्रेरणा दिन मराठी भाषण निबंध
  • शहिद दिवस मराठी माहिती भाषण
  • शिक्षक दिन भाषण मराठी
  • शिवजयंती संपूर्ण तयारी
  • शिवस्वराज्य दिन 2021 कसा साजरा करायचा
  • श्रावण सोमवार मराठी माहिती
  • श्री कृष्णाचा पाळणा मराठी
  • संत गाडगे महाराज भाषण मराठी
  • संविधान दिन भाषण मराठी निबंध
  • सरदार वल्लभभाई पटेल मराठी निबंध भाषण
  • सावित्रीबाई फुले निबंध मराठी
  • सावित्रीबाई फुले भाषण
  • सिंधुताई सपकाळ मराठी माहिती pdf
  • स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी भाषण
  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी
  • स्वामी विवेकानंद भाषण मराठी
  • हनुमान जयंती मराठीत माहिती
  • हरतालिका मराठी माहिती
  • हिंदी दिवस निबंध मराठी माहिती

आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉईन व्हा!

  मराठी भाषण वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे 

आमच्या whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हायचे असेल तर 

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

mahatma gandhi speech in marathi pdf

विविध सणांची माहिती

  • सणाची माहिती
  • आरती संग्रह
  • तुळशीची आरती मराठी मध्ये
  • विठ्ठल मंदिर Live दर्शन
  • Jejuri khandoba live darshan
  • खंडोबा तळी भरण्याची आरती
  • ख्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा
  • गणपती लाईव्ह दर्शन 2021
  • गणपती विसर्जन शुभेच्छा संदेश
  • गणेश चतुर्थी 2021 शुभेच्छा संदेश मराठी
  • गुढी पाडवाचे महत्व
  • गौरी ची आरती मराठी lyrics [pdf]
  • तुळशी विवाह मंगलाष्टके मराठी
  • तुळसी विवाह आरती मराठी
  • दत्त जयंती मराठी माहिती
  • दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
  • दसरा मराठी माहिती निबंध हार्दिक शुभेच्छा संदेश
  • दिवाळी पाडवा माहिती मराठी व शुभेच्छा संदेश
  • दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे
  • दिवाळी साठी रांगोळी सोपी सुंदर व आकर्षक
  • धनत्रयोदशी २०२१ माहिती मराठी
  • नरक चतुर्दशी मराठीत माहिती
  • नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • नागपंचमी पूजा कशी करावी मराठी
  • पंढरपूर लाईव्ह दर्शन 2022
  • मकर संक्रांतीचे उखाणे मराठी
  • महालक्ष्मी ची आरती मराठी मध्ये
  • महाशिवरात्रि पूजा कशी करावी
  • महाशिवरात्री 2022 पूजा विधी
  • मार्गशीर्ष गुरुवार व्रताची मांडणी व पूजा कशी करावी
  • मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवाची कहाणी
  • मोहिनी एकादशी 2021 मराठी माहिती
  • रमजान मुबारक बधाई संदेश मराठी
  • लक्ष्मी पूजन कसे करावे २०२२
  • वटपौर्णिमा पूजा लिस्ट पूजा विधी मराठी
  • वसुबारस रांगोळी इमेज डिझाईन फोटोज
  • शंकराची आरती मराठी
  • श्री हरतालिकेची आरती lyrics Marathi
  • हनुमान चालीसा मराठी lyrics PDF
  • हरतालिकाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
  • होळी सणाची माहिती

Social Plugin

विविध दिन संग्रह.

  • १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण
  • आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा
  • आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा
  • बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
  • मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • राष्ट्रीय बालिका दिन माहिती व शुभेच्छा संदेस
  • राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा संदेश
  • राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 2021
  • संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
  • स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जयंती व पुण्यतिथी संग्रह

  • बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी विनम्र अभिवादन
  • मौलाना अबुल कलाम आझाद मराठी माहिती भाषण निबंध
  • राजश्री शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
  • लाला लजपतराय मराठी भाषण
  • सावित्रीबाई फुले पुण्यतिथी मॅसेज विनम्र अभिवादन

माहिती शोधा

  • श्री दत्तांची आरती
  • श्री रामाचा पाळणा आरती मराठी lyrics pdf
  • हरतालिका आरती मराठी

शुभेच्छा संदेश मराठी

  • शुभेच्छा शायरी
  • छत्रपती संभाजी महाराज जयंती शुभेच्छा
  • 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा
  • Happy Rose day quotes Marathi
  • Teddy day quotes wishes in marathi
  • अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शुभेच्छा
  • गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी
  • गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी
  • गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
  • चॉकलेट डे च्या शुभेच्छा मराठी
  • दसराच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • दिवाळी शुभेच्छा संदेश मॅसेज
  • नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • फादर डे च्या हार्दिक शुभेच्छा
  • फ्रेंडशिप डे च्या हार्दिक शुभेच्छा संदेस
  • बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
  • बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश २०२२
  • भोगीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
  • महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • मार्गशीर्ष पहिला गुरुवार शुभेच्छा
  • रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • राजमाता जिजाऊ शुभेच्छा
  • लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
  • लोकमान्य टिळक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
  • वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा
  • शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी
  • श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी
  • संत गाडगेबाबाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  • सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश
  • सुभाष चंद्र बोस जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
  • होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

Popular Posts

इयत्ता व विषय निहाय कमी झालेला पाठ्यक्रम | reduced deleted syllabus of class 10 ssc 2021-22 pdf

इयत्ता व विषय निहाय कमी झालेला पाठ्यक्रम | reduced deleted syllabus of class 10 ssc 2021-22 pdf

११ वी Cet प्रवेशप्रक्रिया पुन्हा सुरू |cet.11th.admission.org.in | 11th cet exam application form

११ वी Cet प्रवेशप्रक्रिया पुन्हा सुरू |cet.11th.admission.org.in | 11th cet exam application form

25 टक्के कमी झालेला अभ्यासक्रम 2021-22 |maa.ac.in reduced syllabus 2021-22 maharashtra board

25 टक्के कमी झालेला अभ्यासक्रम 2021-22 |maa.ac.in reduced syllabus 2021-22 maharashtra board

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ | guru purnima quotes in marathi 2023२०२३ | guru purnima wishes in marathi

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ | guru purnima quotes in marathi 2023२०२३ | guru purnima wishes in marathi

इ 10वी निकाल कसा चेक कराल ? 10 th online result sites | |10th result kab hain |how to check 10th result 2021|10th maharashtra board result

इ 10वी निकाल कसा चेक कराल ? 10 th online result sites | |10th result kab hain |how to check 10th result 2021|10th maharashtra board result

सेतू अभ्यास पूर्व चाचणी pdf सर्व इयत्ता व विषयांच्या प्रश्नपत्रिका 2023 24  | bridge course pdf class 2nd to 10th | setu abhyas purv chachani 2023 pdf

सेतू अभ्यास पूर्व चाचणी pdf सर्व इयत्ता व विषयांच्या प्रश्नपत्रिका 2023 24 | bridge course pdf class 2nd to 10th | setu abhyas purv chachani 2023 pdf

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी २०२४ | Gudi padwa wishes Quotes message marathi 2024

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी २०२४ | Gudi padwa wishes Quotes message marathi 2024

अण्णाभाऊ साठे जयंती मराठी माहिती 2023 | अण्णाभाऊ साठे मराठी भाषण निबंध | marathi hindi english bhashan

अण्णाभाऊ साठे जयंती मराठी माहिती 2023 | अण्णाभाऊ साठे मराठी भाषण निबंध | marathi hindi english bhashan

सेतू अभ्यासक्रम चाचणी -३ उत्तरे सर्व इयत्ता| Setu abhyaskram chachani test 3 Answers 9th 10th

सेतू अभ्यासक्रम चाचणी -३ उत्तरे सर्व इयत्ता| Setu abhyaskram chachani test 3 Answers 9th 10th

सेतू चाचणी क्रमांक ३ pdf | setu chachani kramank 3 semi marathi | Bridge Course Test 3

सेतू चाचणी क्रमांक ३ pdf | setu chachani kramank 3 semi marathi | Bridge Course Test 3

All contains are dmca protected..

  • Privacy Policy
  • Terms-and-conditions

Footer Copyright

संपर्क फॉर्म.

  • Skip to main content
  • Screen Reader Access
  • Hindi (hi) English (UK)
  • Download Ashram Guide
  • Activities at Ashram
  • Ashram Institutions
  • Ashram Observances
  • Life Chronology
  • Family Tree
  • Reflections

Dandi March

  • Great Trial (1922)
  • Gandhi and Kasturba
  • Ashram Sites
  • Ashram Virtual Tour
  • Gandhi in Ahmedabad Gallery
  • My Life is My Message Gallery
  • Painting Gallery
  • Archives & Library
  • Photo Gallery
  • Video Gallery
  • Audio Gallery
  • Sabarmati Lecture
  • Sabarmati Dialogue
  • Gandhi Samvad
  • 3D Models of the Artifacts
  • Museum Shop
  • You are here:  

mahatma gandhi speech in marathi pdf

The Mahatma

Ashram Tour

On The Eve Of Historic Dandi March (11-3-1930)

Dandi March

[On the 11th of March 1930, the crowd swelled to 10,000 at the evening prayer held on the Sabarmati sands at Ahmedabad. At the end, Gandhiji delivered a memorable speech on the eve of his historic march:]

In all probability this will be my last speech to you. Even if the Government allow me to march tomorrow morning, this will be my last speech on the sacred banks of the Sabarmati. Possibly these may be the last words of my life here.

I have already told you yesterday what I had to say. Today I shall confine myself to what you should do after my companions and I are arrested. The programme of the march to Jalalpur must be fulfilled as originally settled. The enlistment of the volunteers for this purpose should be confined to Gujarat only. From what I have been and heard during the last fortnight, I am inclined to believe that the stream of civil resisters will flow unbroken.

But let there be not a semblance of breach of peace even after all of us have been arrested. We have resolved to utilize all our resources in the pursuit of an exclusively nonviolent struggle. Let no one commit a wrong in anger. This is my hope and prayer. I wish these words of mine reached every nook and corner of the land. My task shall be done if I perish and so do my comrades. It will then be for the Working Committee of the Congress to show you the way and it will be up to you to follow its lead. So long as I have reached Jalalpur, let nothing be done in contravention to the authority vested in me by the Congress. But once I am arrested, the whole responsibility shifts to the Congress. No one who believes in non-violence, as a creed, need, therefore, sit still. My compact with the Congress ends as soon as I am arrested. In that case volunteers. Wherever possible, civil disobedience of salt should be started. These laws can be violated in three ways. It is an offence to manufacture salt wherever there are facilities for doing so. The possession and sale of contraband salt, which includes natural salt or salt earth, is also an offence. The purchasers of such salt will be equally guilty. To carry away the natural salt deposits on the seashore is likewise violation of law. So is the hawking of such salt. In short, you may choose any one or all of these devices to break the salt monopoly.

We are, however, not to be content with this alone. There is no ban by the Congress and wherever the local workers have self-confidence other suitable measures may be adopted. I stress only one condition, namely, let our pledge of truth and nonviolence as the only means for the attainment of Swaraj be faithfully kept. For the rest, every one has a free hand. But, than does not give a license to all and sundry to carry on their own responsibility. Wherever there are local leaders, their orders should be obeyed by the people. Where there are no leaders and only a handful of men have faith in the programme, they may do what they can, if they have enough self-confidence. They have a right, nay it is their duty, to do so. The history of the is full of instances of men who rose to leadership, by sheer force of self-confidence, bravery and tenacity. We too, if we sincerely aspire to Swaraj and are impatient to attain it, should have similar self-confidence. Our ranks will swell and our hearts strengthen, as the number of our arrests by the Government increases.

Much can be done in many other ways besides these. The Liquor and foreign cloth shops can be picketed. We can refuse to pay taxes if we have the requisite strength. The lawyers can give up practice. The public can boycott the law courts by refraining from litigation. Government servants can resign their posts. In the midst of the despair reigning all round people quake with fear of losing employment. Such men are unfit for Swaraj. But why this despair? The number of Government servants in the country does not exceed a few hundred thousands. What about the rest? Where are they to go? Even free India will not be able to accommodate a greater number of public servants. A Collector then will not need the number of servants, he has got today. He will be his own servant. Our starving millions can by no means afford this enormous expenditure. If, therefore, we are sensible enough, let us bid good-bye to Government employment, no matter if it is the post of a judge or a peon. Let all who are co-operating with the Government in one way or another, be it by paying taxes, keeping titles, or sending children to official schools, etc. withdraw their co-operation in all or as many watts as possible. Then there are women who can stand shoulder to shoulder with men in this struggle.

You may take it as my will. It was the message that I desired to impart to you before starting on the march or for the jail. I wish that there should be no suspension or abandonment of the war that commences tomorrow morning or earlier, if I am arrested before that time. I shall eagerly await the news that ten batches are ready as soon as my batch is arrested. I believe there are men in India to complete the work our begun by me. I have faith in the righteousness of our cause and the purity of our weapons. And where the means are clean, there God is undoubtedly present with His blessings. And where these three combine, there defeat is an impossibility. A Satyagrahi, whether free or incarcerated, is ever victorious. He is vanquished only, when he forsakes truth and nonviolence and turns a deaf ear to the inner voice. If, therefore, there is such a thing as defeat for even a Satyagrahi, he alone is the cause of it. God bless you all and keep off all obstacles from the path in the struggle that begins tomorrow.

Mahatma, Vol. III (1952), pp. 28-30 Source: Selected works of Mahatma Gandhi Volume-Six

About Gandhi Ashram

  • Speeches(Text)

Visitor Info

Subscribe to newsletter.

  • FC(R)A Documents
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
  • Copyright Policy
  • Hyperlinking Policy
  • Accessibility Statement
  • Recent Updates
  • Request For Proposal
  • Privacy Policy for Mobile Apps

Copyright © 2005 - 2019 Sabarmati Ashram Preservation and Memorial Trust.

Beta Version

Examples

The Quit India Speech

Speech generator.

mahatma gandhi speech in marathi pdf

Download The Quit India Speech by Mahatma Gandhi in PDF

The Quit India Speech by Mahatma Gandhi(Text-Version)

I believe that in the history of the world, there has not been a more genuinely democratic struggle for freedom than ours. I read Carlyle’s French Revolution while I was in prison, and Pandit Jawaharlal has told me something about the Russian revolution. But it is my conviction that inasmuch as these struggles were fought with the weapon of violence they failed to realize the democratic ideal. In the democracy which I have envisaged, a democracy established by non-violence, there will be equal freedom for all. Everybody will be his own master. It is to join a struggle for such democracy that I invite you today. Once you realize this you will forget the differences between the Hindus and Muslims, and think of yourselves as Indians only, engaged in the common struggle for independence.

Then, there is the question of your attitude towards the British. I have noticed that there is hatred towards the British among the people. The people say they are disgusted with their behaviour. The people make no distinction between British imperialism and the British people. To them, the two are one. This hatred would even make them welcome the Japanese. It is most dangerous. It means that they will exchange one slavery for another. We must get rid of this feeling. Our quarrel is not with the British people, we fight their imperialism. The proposal for the withdrawal of British power did not come out of anger. It came to enable India to play its due part at the present critical juncture. It is not a happy position for a big country like India to be merely helping with money and material obtained willy-nilly from her while the United Nations are conducting the war.

We cannot evoke the true spirit of sacrifice and valour, so long as we are not free. I know the British Government will not be able to withhold freedom from us, when we have made enough self-sacrifice. We must, therefore, purge ourselves of hatred. Speaking for myself, I can say that I have never felt any hatred. As a matter of fact, I feel myself to be a greater friend of the British now than ever before. One reason is that they are today in distress. My very friendship, therefore, demands that I should try to save them from their mistakes. As I view the situation, they are on the brink of an abyss. It, therefore, becomes my duty to warn them of their danger even though it may, for the time being, anger them to the point of cutting off the friendly hand that is stretched out to help them. People may laugh, nevertheless that is my claim. At a time when I may have to launch the biggest struggle of my life, I may not harbor hatred against anybody.

Twitter

Text prompt

  • Instructive
  • Professional

Generate a speech on the importance of teamwork in school projects

Create a speech encouraging students to participate in extracurricular activities.

We will keep fighting for all libraries - stand with us!

Internet Archive Audio

mahatma gandhi speech in marathi pdf

  • This Just In
  • Grateful Dead
  • Old Time Radio
  • 78 RPMs and Cylinder Recordings
  • Audio Books & Poetry
  • Computers, Technology and Science
  • Music, Arts & Culture
  • News & Public Affairs
  • Spirituality & Religion
  • Radio News Archive

mahatma gandhi speech in marathi pdf

  • Flickr Commons
  • Occupy Wall Street Flickr
  • NASA Images
  • Solar System Collection
  • Ames Research Center

mahatma gandhi speech in marathi pdf

  • All Software
  • Old School Emulation
  • MS-DOS Games
  • Historical Software
  • Classic PC Games
  • Software Library
  • Kodi Archive and Support File
  • Vintage Software
  • CD-ROM Software
  • CD-ROM Software Library
  • Software Sites
  • Tucows Software Library
  • Shareware CD-ROMs
  • Software Capsules Compilation
  • CD-ROM Images
  • ZX Spectrum
  • DOOM Level CD

mahatma gandhi speech in marathi pdf

  • Smithsonian Libraries
  • FEDLINK (US)
  • Lincoln Collection
  • American Libraries
  • Canadian Libraries
  • Universal Library
  • Project Gutenberg
  • Children's Library
  • Biodiversity Heritage Library
  • Books by Language
  • Additional Collections

mahatma gandhi speech in marathi pdf

  • Prelinger Archives
  • Democracy Now!
  • Occupy Wall Street
  • TV NSA Clip Library
  • Animation & Cartoons
  • Arts & Music
  • Computers & Technology
  • Cultural & Academic Films
  • Ephemeral Films
  • Sports Videos
  • Videogame Videos
  • Youth Media

Search the history of over 866 billion web pages on the Internet.

Mobile Apps

  • Wayback Machine (iOS)
  • Wayback Machine (Android)

Browser Extensions

Archive-it subscription.

  • Explore the Collections
  • Build Collections

Save Page Now

Capture a web page as it appears now for use as a trusted citation in the future.

Please enter a valid web address

  • Donate Donate icon An illustration of a heart shape

Speeches and writings of M.K. Gandhi

Bookreader item preview, share or embed this item, flag this item for.

  • Graphic Violence
  • Explicit Sexual Content
  • Hate Speech
  • Misinformation/Disinformation
  • Marketing/Phishing/Advertising
  • Misleading/Inaccurate/Missing Metadata

plus-circle Add Review comment Reviews

5,132 Views

DOWNLOAD OPTIONS

For users with print-disabilities

IN COLLECTIONS

Uploaded by hank_b on November 10, 2009

SIMILAR ITEMS (based on metadata)

IMAGES

  1. Mahatma Gandhi Speech in Marathi PDF

    mahatma gandhi speech in marathi pdf

  2. mahatma gandhi information in marathi speech Archives

    mahatma gandhi speech in marathi pdf

  3. Mahatma Gandhi Speech in Marathi

    mahatma gandhi speech in marathi pdf

  4. महात्मा गांधी भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi इनमराठी

    mahatma gandhi speech in marathi pdf

  5. महात्मा गांधी जयंती भाषण

    mahatma gandhi speech in marathi pdf

  6. महात्मा गांधी जयंती भाषण 10 ओळी 2023

    mahatma gandhi speech in marathi pdf

VIDEO

  1. महात्मा गांधी भाषण / निबंध

  2. महात्मा गांधी मराठी भाषण 2023| Mahatma Gandhi Marathi Bhashan

  3. महात्मा गांधी भाषण

  4. महात्मा गांधी निबंध मराठी / Mahatma gandhi nibandh marathi/ essay on mahatma gandhi in marathi

  5. महात्मा गांधी 10 ओळी मराठी निबंध/10 lines essay on Mahatma Gandhi in Marathi/Mahatma Gandhi nibandh

  6. महात्मा गांधी निबंध मराठी/Mahatma Gandhi nibandh marathi/महात्मा गांधी भाषण मराठी

COMMENTS

  1. महात्मा गांधी भाषण मराठी Mahatma Gandhi Speech in Marathi

    रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या बापूंना सर्वप्रथम "महात्मा" ही उपाधी धारण केली होती. "बापू सन्मान करतो आम्ही, तुमच्या महान ...

  2. (2024) महात्मा गांधी जयंती भाषण मराठी

    महात्मा गांधी भाषण मराठी Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi : तर मंडळी वरील लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत 2 महात्मा गांधी जयंती भाषण शेअर केलेत. आशा आहे ...

  3. महात्मा गांधी जयंती भाषण मराठी 2024

    तुम्हाले महात्मा गांधी भाषण मराठी mahatma gandhi bhashan mahatma gandhi speech in marathi भाषण कसे वाटले हे कळण्यासाठी खाली कमेंट मध्ये नक्की सांगा.जर तुम्हाला हे ...

  4. महात्मा गांधी मराठी भाषण

    Mahatma Gandhi Speech in Marathi. gandhi jayanti speech in marathi. ... Marathi Letter Writing PDF | 2021. June 03, 2021. 20 छान छान गोष्टी मराठीत | 20 Chan Chan Goshti Marathi with Morals | Lahan Mulanchya goshti. March 27, 2023. About Us.

  5. महात्मा गांधी पुण्यतिथी भाषण मराठी

    महात्मा गांधी पुण्यतिथी भाषण मराठी | महात्मा गांधी जयंती भाषण निबंध| mahatma gandhi bhashan marathi | mahatma gandhi nibandh marathi pdf

  6. Mahatma Gandhi Speech in Marathi PDF

    REPORT THIS If the purchase / download link of Mahatma Gandhi Speech in Marathi PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for ...

  7. महात्मा गांधी

    महात्मा गांधी : जीवन आणि कार्य (अनुवादित, मूळ इंग्रजी The Life of Mahatma Gandhi, लेखक - लुई फिशर; मराठी अनुवादक : वि.रा. जोगळेकर). हेच पुस्तक वाचून ...

  8. महात्मा गांधी " वर मराठी भाषण Mahatma Gandhi Speech In Marathi

    Mahatma Gandhi Speech In Marathi तुम्हाला कसे वाटले आम्हाला जरूर कळवा ! हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-Child Labour Essay In Marathi. Doordarshan Essay In Marathi

  9. Download Free Gandhi E-Books in Marathi

    Download. » आरोग्याची किल्ली (with Audiobook) New. Download. » मंगल-प्रभात (with Audiobook) New. Download. » विनोबांचा सर्वोदय विचार New. Download. Mahatma Gandhi eBooks in Marathi, free download Gandhi ebooks at one click.

  10. महात्मा गांधीजी 10 ओळीचे भाषण

    गांधी जयंती खूप सोपे आणि सुंदर भाषण मराठी / Mahatma Gandhi Speech in Marathi/ Gandhi Jayanti Bhashan

  11. Non-violent resistance (Satyagraha) : Gandhi, Mahatma, 1869-1948 : Free

    Access-restricted-item true Addeddate 2009-09-01 14:27:12 Associated-names Kumarappa, Bharatan, 1896-1957, ed Boxid

  12. PDF Mahatma Gandhi

    Mahatma Gandhi

  13. PDF My Non-violence

    Gandhiji, being the collection of his speeches and writings from 1921 to his last day. But as the said two volumes run near about 1000 pages, it was felt essential to present the basic thoughts of Mahatma Gandhi on non-violence in a handy single volume and the following pages are the outcome of that effort.

  14. Mahatma Gandhi Speech in Marathi

    Mahatma Gandhi Speech in Marathi | महात्मा गांधी भाषण मराठी | Mahatma Gandhi Marathi Bhashan Disclaimer & Copyright This ...

  15. Mahatma Gandhi Speech in Marathi PDF Download

    In the spirit of commemorating Gandhi Jayanti, speeches delivered in Marathi play a vital role in conveying the essence of Mahatma Gandhi's teachings to a broader audience. These speeches serve as a platform to delve into Gandhi's wisdom, shedding light on his philosophy of ahimsa (nonviolence), satya (truth), and sarvodaya (welfare of all).

  16. महात्मा गांधी जयंती भाषण

    महात्मा गांधी जयंती भाषण २०२२| महात्मा गांधी निबंध मराठी | mahatma gandhi jayanti speech in marathi 2022| mahatma gandhi easy in marathi pdf

  17. eBooks On & By Gandhi: Download Free Gandhi E-Books

    Mahatma Gandhi +91-23872061 +91-9022483828. [email protected]. Menu. Home; About Us; Gandhi eBooks; Buy Books; Feedback; Sitemap; Contact Us; Submit. Home; Gandhi e-Books (English) GANDHI E-BOOKS Hundreds of Mahatma Gandhi eBooks for free download in PDF, EPUB and MOBI formats. ... Speeches and Writings of M.K. Gandhi. With an introduction by ...

  18. PDF An Autobiography Or

    Mahatma Gandhi on philosophy, religion, culture, economics, politics, sociology and education. I earnestly hope that these Selected Works will be found useful by all those who are keenly interested in the study of Gandhian thought on different aspects of life. I take this opportunity of thanking the Navajivan Trust for giving me the

  19. PDF India of My Dreams

    speeches of Mahatma Gandhi, to give the reader an idea of the part which he expects a completely free and independent India of his conception to play in her own domestic affairs as well as in her relations with the rest of the world. On 15 th August, 1947, India will have finally shaken off the yoke of foreign which for the past century and ...

  20. Speech Of Mahatma Gandhi On The Eve Of Dandi March (Salt Satyagraha)

    If, therefore, there is such a thing as defeat for even a Satyagrahi, he alone is the cause of it. God bless you all and keep off all obstacles from the path in the struggle that begins tomorrow. Check out famous speech of Mahatma Gandhiji on the eve of historic Dandi March. On the 11th of March 1930, the crowd swelled to 10,000 at the evening ...

  21. Mahatma Gandhi Speeches And Writings : Digital Library Of India : Free

    dc.format.mimetype: application/pdf dc.language.iso: English ... Bennington Public Library dc.subject.classification: Mahatma Gandhi Speeches And Writings dc.title: Mahatma Gandhi Speeches And Writings. Addeddate 2017-01-15 18:13:13 Identifier in.ernet.dli.2015.158947 Identifier-ark ark:/13960/t0vq84c9r Ocr ABBYY FineReader 11.0 ...

  22. The Quit India Speech by Mahatma Gandhi, Download Pdf

    Download The Quit India Speech by Mahatma Gandhi in PDF. The Quit India Speech by Mahatma Gandhi(Text-Version) I believe that in the history of the world, there has not been a more genuinely democratic struggle for freedom than ours. I read Carlyle's French Revolution while I was in prison, and Pandit Jawaharlal has told me something about ...

  23. Speeches and writings of M.K. Gandhi : Gandhi, Mahatma, 1869-1948

    Speeches and writings of M.K. Gandhi ... Speeches and writings of M.K. Gandhi by Gandhi, Mahatma, 1869-1948. Publication date 1922 Topics India -- Politics and government ... PDF download. download 1 file . RAW CORNELL BOOK ZIP download. download 1 file ...

  24. PDF His Life Writings and Speeches

    2.^ mahatmagandhi hislife,writingsandspeeches withforeword by mrs.sarojininaidqr 4 ganesh&co.,madras